सध्या धनश्री, अश्नीर ग्रोव्हरच्या रिअॅलिटी शो "राईज अँड फॉल" मध्ये सहभागी झाली आहे. शोच्या नवीन भागात तिने तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला. धनश्रीच्या म्हणाली, लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच तिला युजवेंद्रच्या आयुष्यात काहीतरी बिनसलंय असं जाणवलं. तिला तो फसवत असल्याचंही तेव्हा समजलं. तरीही, दोघांनी नातं टिकवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी चार वर्षांनी हे लग्न तुटलं.
advertisement
बिग बॉस 19 अभिषेक बजाजची EX पत्नी; दीड वर्षातच मोडलं लग्न, केले गंभीर आरोप
कुब्रा सैतसोबत गप्पा मारताना धनश्रीने सांगितलं की, “मला दुसऱ्या महिन्यातच कळलं होतं की हे लग्न टिकणार नाही.” कुब्राने आश्चर्य व्यक्त करत विचारलं की इतक्या लवकर का? त्यावर धनश्रीने थोडक्यात उत्तर दिलं, “कधी कधी वेळ न घालवता सत्य समोर येतं.” या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. चाहतेही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काहीजण धनश्रीच्या धैर्याचं कौतुक करत आहेत, तर काही चहलच्या बाजूने उभे राहत आहेत.
दरम्यान, याआधी शोमध्येच धनश्रीने पोटगीबाबतच्या बातम्या फेटाळून लावल्या होत्या. तिने सांगितलं, “आम्ही परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आहे. कोणतीही पोटगी नव्हती. अफवा पसरवल्या गेल्या होत्या, पण त्यात काहीही सत्य नाही.”