शेखर कपूर यांनी ‘फिल्मफेअर’च्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत देव आनंद यांच्याबद्दल सांगितलं. ते म्हणाले की, देव आनंद यांनी १९७४ मध्ये ‘इश्क इश्क इश्क’ हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटात शबाना आझमी, झीनत अमान आणि कबीर बेदी असे मोठे कलाकार होते. हा चित्रपट यशस्वी होईल असं त्यांना वाटत होतं, त्यामुळे त्यांनी स्वतःची पूर्ण कमाई यात लावली होती.
advertisement
चित्रपट संपण्याआधीच प्रेक्षकांनी थिएटर सोडला
शेखर कपूर म्हणाले, “मी देव आनंद यांच्यासोबत हॉटेलमध्ये होतो, जिथे चित्रपट पाहिल्यानंतर सगळे फोनवर त्यांचं अभिनंदन करत होते. पण, काही वेळातच सत्य समोर आलं. एका फोन कॉलवर समजलं की, प्रेक्षक चित्रपट संपण्याआधीच थिएटर सोडून जात आहेत.”
शेखर कपूर यांनी सांगितलं की, फक्त १५ मिनिटांत देव आनंदना समजलं की, त्यांचा चित्रपट फ्लॉप झाला आहे आणि त्यांनी लावलेले सगळे पैसे बुडाले आहेत. ते काही वेळ शांत झाले, बाथरूममध्ये गेले आणि बाहेर आल्यावर हसत-हसत म्हणाले, “चल, एक नवा चित्रपट बनवतो. आत्ताच एक नवी कल्पना सुचली आहे.”
त्यांच्या या सकारात्मकतेने आणि हार न मानण्याच्या वृत्तीने शेखर कपूर खूपच प्रभावित झाला. देव आनंद यांची ही जिंदादिली आजही अनेकांना प्रेरणा देते.