संजय मिश्रा यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, “अभिजीत पानसे मनसेचे पदाधिकारी आहेत, हे मला सुरुवातीला माहिती नव्हतं. त्यांच्या पक्षाच्या विचारांवर माझा काही आक्षेप नाही, पण याच माणसाने ‘घाशीराम कोतवाल’सारखं नाटक हिंदीत आणलं, ही गोष्ट कौतुकास्पद आहे.” यावेळी संजय मिश्रा यांनी ‘ऋत्विक घटक’ या प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शकाचं उदाहरण दिलं. ते म्हणाले की, ते विचारांनी साम्यवादी होते, पण मला त्यांचे चित्रपट खूप आवडायचे. मला अभिजीतच्या राजकीय विचारांनी काहीच फरक पडत नाही, असं संजय मिश्रा यांनी स्पष्ट केलं.
advertisement
राज ठाकरे हिंदीत बोलायला लागले!
एबीपी माझाला दिलेल्या खास मुलाखतीत राज ठाकरेंच्या भेटीबद्दल बोलताना संजय मिश्रा म्हणाले, “या नाटकादरम्यान एक दिवस राज ठाकरे यांनी आम्हाला भेटायला बोलावलं. ते सगळ्यांसोबत मराठीत बोलत होते. पण, मी तिथे बसताच ते म्हणाले, ‘संजय आला आहे, आता आपण हिंदीत बोलूया.’”
त्यानंतर मिश्रा म्हणाले, राज त्यावेळी एक पुस्तक वाचत होते, त्यामध्ये काही नोंदी होत्या. त्या नोंदी राजस्थानी भाषेतील होत्या आणि वाचत होते राज ठाकरे. आपण राज यांच्याबद्दल म्हणतो की ते असेच आहेत, ते रागीट आहेत, ते गुंड आहेत. पण जेव्हा तुम्ही त्यांना भेटता, तेव्हा तुम्हाला कळतं की ते काहीतरी वेगळेच आहेत.
संजय मिश्रा यांनी ‘घाशीराम कोतवाल’ हिंदीमध्ये आणण्याचं श्रेय अभिजीत पानसे यांना दिलं. या नाटकाचं दिग्दर्शन अभिजीत पानसे यांच्यासोबत भालचंद्र कुबल यांनीही केलं आहे. नाटकाची संहिता वसंत देव यांनी हिंदीत लिहिली आहे.