'तारक मेहता का उल्टा चश्मा' या हिंदी मालिकेला अनेक वर्ष प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे. या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी काही वादविवादांवर आपले स्पष्टीकरण दिले आहे. त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. जेव्हा कलाकार ही मालिका सोडून जातात तेव्हा ते खूप नाराज होतात. त्यांच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट साइन केलं जातं असं म्हणतात.
advertisement
25 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर करणार तेजश्री प्रधान, आहे मराठी सुपरस्टारचा मुलगा
अफवांवर काय बोलले मोदी ?
असित मोदी यांनी या अफवांवरती भाष्य केलं. ते म्हणाले, "लोकं म्हणतात कलाकारांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अजब असे नियम आहेत. तर त्या लोकांनी स्वतःच येऊन हे कॉन्ट्रॅक्ट पाहावं. आम्ही असे कोणतेच नियम तयार केले नाहीत. जसे कि स्त्री-पुरुष डेट नाही करणार वेगरै. पण काही नियम आहेतच, कारण या मालिकेला आणि चॅनलला कोणताही धक्का बसणार नाही. सगळ्या कालाकारांना या 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेमुळे चांगली ओळख मिळाली आहे. त्यामुळे त्यांना समजायला हवे की काही नियम हे बॉन्ड आणि सुरक्षिततेसाठी केले आहेत."
मालिका सोडून गेलेल्या कलाकारां विषयी काय म्हणाले असित ?
असित मोदी मालिका सोडून गेलेल्या कलाकारांविषयी म्हणाले, "कालाकारांनी आपल्या कामात बेस्ट दिले आहे. मी कधीच कोणाला मालिका सोडून जा असे स्वतः सांगितले नाही. पण काही कलाकार हे मालिका सोडून जातात, ते असे वक्तव्य करतात जी खरंच चूकीची असतात. त्यातील काही कलाकार परत यायची इच्छा व्यक्त करतात आणि आलेही आहेत. पण मालिका चालत राहिली पाहिजे. त्यामुळे या वातावरणात नियम आणि कायदे खूप गरजेचे आहेत."
आतापर्यंत जेनिफर मेस्त्री, गुरुचरण सिंह सोढी, शैलेश लोढा यांसारखे अभिनते मालिका सोडून गेले आहेत. त्यानंतर सोडून गेलेल्या कालाकारांनी निर्मात्यांवर अनेक आरोप केले होते. अभिनेत्री दिशा वकानी जी 8 वर्षांपासून गायब आहे, ती परत येण्याची उत्सुकता आजही चाहत्यांना आहे.
