अंजू माने यांनी सांगितलं की, गेल्या 20 वर्षांपासून त्या कचरा वेचण्याचं काम करत आहेत. 20 नोव्हेंबरला त्या नेहमीप्रमाणे सदाशिव पेठ परिसरात कचरा वेचण्यासाठी गेल्या होत्या. तेव्हा कचरा वेचत असताना रस्त्याच्या कडेला एक बॅग दिसली. त्यांना वाटलं, कुणीतरी कचरा किंवा औषधांच्या बाटल्या टाकून दिल्या असतील, म्हणून त्यांनी ती बॅग उचलून आणली. मात्र बॅग जड असल्यामुळे त्यांनी ती उघडून पाहिली आणि त्यामध्ये तब्बल 10 लाख रुपये होते.
advertisement
Weather Alert : महाराष्ट्रात वार फिरलं, ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट
क्षणाचाही विलंब न करता त्यांनी बॅग मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. बॅग मालकाचा शोध घेत असतानाच रस्त्याला एक अस्वस्थ अवस्थेत माणूस काहीतरी शोधत होता. त्या व्यक्तीची 10 लाख रुपये असलेली बॅग हरवल्याचे समजले. एवढी मोठी रक्कम गमावल्याने ती व्यक्ती घाबरून गेली होती, त्यांना बोलताही येत नव्हते. अंजु माने यांनी त्या व्यक्तीला पाणी देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. सापडलेली बॅग त्यांचीच असल्याचे निश्चित करून 10 लाख रक्कम त्यांना परत दिली. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल साडीसह रोख रक्कम देत त्यांचा सत्कारही करण्यात आला. सर्वत्रच त्यांच्या प्रामाणिक पणाचं कौतुक केलं जातं आहे.





