म्यानमारमध्ये भूकंप आल्यावर त्याच्या सीमेवरील भारतीय भागात विशेषतः ईशान्येकडील राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पण ते इतके शक्तिशाली नव्हते की कोणतेही नुकसान होऊ शकेल. म्यानमारमध्ये जेव्हा जेव्हा धक्के आले, तेव्हा तेव्हा येथेही जमीन हादरली, पण कोणतेही नुकसान झाले नाही. यासाठी मुख्यतः पृथ्वीची रचना जबाबदार आहे. त्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.
दोन्ही देशांमधील 'विभागलेली' जमीन:
advertisement
म्यानमार आणि भारत वेगवेगळ्या टेक्टॉनिक प्लेट्सवर (tectonic plates) वसलेले आहेत. ज्या जमिनीवर आपण राहतो, ती अनेक प्लेट्समध्ये विभागलेली आहे. म्यानमार आणि थायलंड ज्या प्लेटवर आहेत, त्यावर भारत नाही. त्यामुळे धक्के कमी जाणवतात. भारत भारतीय टेक्टोनिक प्लेटचा (Indian Plate) भाग आहे. जी युरेशियन प्लेटला (Eurasian Plate) धडकते. या धडकेमुळे हिमालय पर्वतरांग तयार झाली आहे. तर, म्यानमार मुख्यतः सुंडा प्लेट (Sunda Plate) आणि बर्मा मायक्रोप्लेटचा (Burma Microplate) भाग आहे. ज्या इंडो-ऑस्ट्रेलियन प्लेट आणि युरेशियन प्लेटमुळे प्रभावित होतात. भारत आणि म्यानमारच्या सीमेवर सबडक्शन झोन (Subduction Zone) आहे. जिथे भारतीय प्लेट ईशान्येकडे सरकत आहे आणि बर्मा मायक्रोप्लेटच्या खाली दबली जात आहे. त्यामुळेच म्यानमार आणि भारतातील ईशान्येकडील राज्ये मिझोराम, नागालँड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश येथे भूकंपाचा धोका जास्त असतो. पण शुक्रवारी म्यानमारमध्ये भूकंप आला, तेव्हा ती टेक्टोनिक प्लेट खूप हादरली. तर भारतीय टेक्टोनिक प्लेटला फक्त त्या प्लेटचा धक्का बसला, जो खूप मंद होता.
Myanmar Earthquake: तेव्हा पृथ्वी १० मिनिटे हादरली, जगाच्या इतिहासातील महाभूकंप
कमकुवत माती विरुद्ध खडकाळ जमीन:
म्यानमार आणि भारतातील ईशान्येकडील भागांच्या भूगर्भीय रचनेत फरक आहे. म्यानमारमध्ये जर कमकुवत माती किंवा कमकुवत खडक असतील. तर तेथे भूकंपाचा परिणाम जास्त झाला. तर भारतातील काही भागांमध्ये खडकाळ किंवा स्थिर जमीन असल्यामुळे नुकसान कमी झाले. भूकंपाची खोलीही महत्त्वाची ठरते. खोली जास्त असल्यामुळे भारतात पृष्ठभागावर पोहोचताना लाटांची शक्ती कमी झाली.
भूकंपाचे केंद्र आणि अंतर:
भूकंपाचे केंद्र (एपिसेंटर) म्यानमारमध्ये होते आणि भारतातील भाग त्यापासून काही अंतरावर होते. भूकंपाच्या लाटा अंतरानुसार त्यांची ऊर्जा गमावतात. ईशान्य भारतात धक्के जाणवले, पण केंद्रापासूनच्या अंतरानुसार त्यांची तीव्रता कमी झाली. पण याचा सर्वात मोठा परिणाम टेक्टोनिक प्लेट्समुळे कमी झाला.
बांधकाम आणि तयारी:
भारतातील ईशान्येकडील भाग भूकंपप्रवण क्षेत्र असल्याने तेथील लोक आणि प्रशासन आधीपासूनच सतर्क असतात. भूकंप-प्रतिरोधक बांधकाम तंत्रज्ञानाचा वापरही काही प्रमाणात नुकसान कमी करण्यास मदत करतो. म्यानमारमध्ये अशी तयारी कमी होती. त्यामुळे तेथे जास्त विध्वंस झाला. तर भारतातील लोक यासाठी आधीपासूनच सावध असतात.
भूकंप येण्याआधी आकाशात दिसतात Earthquake Lights,शास्त्रज्ञही हैराण
धक्क्यांचे स्वरूप:
भूकंपाचे धक्के वेगवेगळ्या दिशांना वेगवेगळा परिणाम करतात. म्यानमारच्या दिशेने लाटांचा मुख्य प्रभाव गेला असेल. तर भारताच्या दिशेने कमी ऊर्जा पोहोचली असेल. तज्ञांचे म्हणणे आहे की, ईशान्य भारत टेक्टोनिक प्लेट्सच्या जंक्शनवर आहे आणि भूकंपाचा धोका नेहमीच असतो. त्यामुळे तेथे सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे.