लग्नानंतर लोक खरोखर पश्चात्ताप करतात का? की जे अविवाहित राहतात त्यांना जास्त पश्चात्ताप होतो? या विषयावर अनेक सर्वेक्षणं आणि अभ्यास केले गेले आहेत आणि त्यात आलेले निकाल खूप मनोरंजक आहेत. चला तुम्हाला सांगूया की लोक असे का विचार करतात?
विवाहित लोक अधिक आनंदी असतात
1. अनेक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की विवाहित लोक सरासरी अधिक आनंदी असतात, विशेषतः जेव्हा नातेसंबंध निरोगी असतात.
advertisement
2. एका दीर्घकालीन अभ्यासानुसार, चांगलं वैवाहिक जीवन चांगलं मानसिक आरोग्य आणि कमी एकाकीपणाकडे नेतं.
2. वाईट विवाह, पश्चात्तापाचं मूळ
1. संघर्षात अडकलेले, विषारी नातेसंबंधात अडकलेले किंवा दुःखी विवाहात अडकलेले लोक अविवाहित लोकांपेक्षा जास्त तणावग्रस्त असतात.
2. असे लोक सहसा म्हणतात, "कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी मी काळजीपूर्वक विचार केला असता तर आज आपल्याला या गोष्टीचा सामना करावा लागला नसता.
Relationship : Live In नंतर आता DADT चा ट्रेंड, रिलेशनशिपमधील हा नवा प्रकार आहे तरी काय?
3. अविवाहित लोक : स्वातंत्र्य विरुद्ध एकटेपणा
1. काही लोक अविवाहित राहून, करिअर आणि छंदांवर लक्ष केंद्रीत करून त्यांच्या आयुष्यात आनंदी असतात.
2. पण कधीकधी वाढत्या वयानुसार एकटेपणा त्यांना त्रास देऊ लागतो.
4. वृद्धांचं मत
1. वृद्धांच्या अनुभवावर आधारित सर्वेक्षणातून असं दिसून आलं आहे की बहुतेक लोकांना लग्न केल्याबद्दल पश्चात्ताप होत नाही. जोडीदार चांगला असेल तर जीवन आनंदी होतं.
2. परंतु सर्वात मोठा पश्चात्ताप म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती चुकीचा जोडीदार निवडते.
हिच्या प्रेमात जो पडला तो कर्माने गेला, तरुणीने 8 बॉयफ्रेंड बनवले, सगळे उद्ध्वस्त झाले, कारण काय?
निकाल
1. लग्नाचे लाडू विचारपूर्वक खावेत.
2. लग्न करणं चुकीचं नाही आणि अविवाहित राहणंही चुकीचं नाही, निर्णय सुज्ञपणे आणि विचारपूर्वक घेतला पाहिजे.
3. योग्य जोडीदार आणि परस्पर समंजसपणा असेल तर मॅरिड लाइफ चांगलं बनवू शकते.
4. परंतु केवळ सामाजिक दबावामुळे किंवा एकाकीपणाच्या भीतीमुळे लग्न करणं हानिकारक ठरू शकतं.