हजारीबाग : भारतात कोट्यवधी लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. काहीजण दिवसभरात 2-4 वेळाही चहा पितात. सकाळ-संध्याकाळचा चहा तर घरोघरी ठरलेलाच असतो. म्हणूनच चहा हे भारतातलं सर्वात लोकप्रिय पेय मानलं जातं. अनेकजण ऊर्जावान राहण्यासाठी चहा पितात. चहा प्यायल्याने झोप उडते असं म्हटलं जातं. परंतु जास्त चहा आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. असे अनेक आजार आहे, ज्यांनी पीडित असाल तर चहा आहारातून वगळायला हवा, असं आयुर्वेद सांगतं.
advertisement
डॉक्टर मकरंद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चहाचे शरिरावर अनेक दुष्परिणाम होतात. जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जाणवतात. चहामुळे झोप उडते, त्यामुळे निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो. झोप पूर्ण न झाल्याने अशक्तपणा येऊ शकतो.
हेही वाचा : गरे खाऊन बिया फेकू नका, त्यांची भाजी मटणापेक्षा लागते भारी! डायबिटीजवर रामबाण
एकूणच चहामुळे स्लिप सायकल बिघडतं. मग काहीजणांना अस्वस्थ वाटतं, उलटीसारखं होतं. दिवसभरातून अति चहा प्यायल्यास पोटाचे विकार होऊ शकतात. अपचनाचा सामनाही करावा लागू शकतो.
जास्त चहा प्यायल्याने दात पिवळे पडतात. जुलाब लागू शकतात. डॉक्टर सांगतात की, चहा प्यावासा वाटतच असेल तर ग्रीन टी प्यावी. हा चहा अनेक आजारांवर भारी पडेल. परंतु ग्रीन टीसुद्धा अति पिऊ नये.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित असली, तरी कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्यापूर्वी आपण स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.