आजकाल हृदयविकार वेगाने वाढत आहेत. विशेषतः भारतात लठ्ठपणा, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि वाईट जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा धोका सतत वाढत आहे. तथापि जर आपण भारतीय आणि परदेशी लोकांची तुलना केली तर भारतीयांमध्ये हा धोका जास्त दिसून येतो.
याबाबत स्थूलता तज्ज्ञ डॉ. शिप्रा माथूर म्हणाल्या की, भारतीयांच्या रक्तवाहिन्या नैसर्गिकरित्या पातळ असतात. त्यामुळे रक्त गोठण्याची म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या लवकर तयार होण्याची शक्यता वाढते. जेव्हा रक्ताची गुठळी तयार होते तेव्हा ती रक्तप्रवाह थांबवू शकते आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकते. दुसरीकडे, पाश्चात्य देशांतील लोकांच्या रक्तवाहिन्या तुलनेने रुंद असतात, ज्यामुळे त्यांच्यामध्ये रक्त गोठण्याची शक्यता कमी असते. या कारणास्तव, भारतीयांच्या तुलनेत परदेशात हृदयविकाराचं प्रमाण कमी असतं.
advertisement
Heart Attack : जिमला जातात, हेल्दी आहेत, तरी हार्ट अटॅक कसा येतो?
लठ्ठपणा हे देखील हृदयविकाराचा धोका वाढवण्याचं एक मोठं कारण आहे. जास्त वजनामुळे शरीरात कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात. याचा रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि हृदयावर जास्त दबाव येतो.
हे कसं टाळायचं?
निरोगी आहार असणं खूप महत्त्वाचं आहे. जंक फूड टाळा आणि आहारात हिरव्या भाज्या, फळे, काजू आणि हेल्दी फॅट्सचा समावेश करा.
दररोजच्या व्यायामामुळे हृदय मजबूत राहतं. म्हणून चालणं, योगा आणि कार्डिओ एक्सरसाइझ यांचा दैनंदिन दिनचर्येत समावेश केला पाहिजे.
Heart Attack : हा ब्लड ग्रुप असेल तर येऊ शकतो हार्ट अटॅक, तुमचा रक्तगट तर नाही ना तपासा
वजन नियंत्रित करणंदेखील महत्त्वाचं आहे. कारण लठ्ठपणा हा हृदयासाठी सर्वात मोठा धोका आहे.
धूम्रपान आणि मद्यपान टाळावं, कारण या सवयी हृदयाला कमकुवत करतात आणि रक्तदाब वाढवतात.
वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि साखरेची पातळी नियंत्रित करता येईल.