TRENDING:

Breakfast : न्याहारीचा आणि वजन वाढण्याचा काही संबंध असतो का ? जाणून घ्या आहारतज्ज्ञांचं मत

Last Updated:

नाश्ता न केल्यानं रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि या सवयीमुळे लठ्ठपणा वाढतो. आरोग्य संशोधनानुसार, जे लोक नाश्ता वगळतात त्यांना टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका तीस टक्के जास्त असतो. रक्तातील साखरेच्या असंतुलित पातळीमुळे हे परिणाम होतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बहुतेकांच्या दिवसाची सुरुवात न्याहारीनं होते. काहीजण केवळ चहा पितात. पण काहीजण विविध कारणांमुळे न्याहारी करत नाहीत, त्याचे शरीरावर परिणाम जाणवतात.
News18
News18
advertisement

न्याहारी करणं शरीरासाठी आवश्यक आहे. रात्रीच्या जेवणानंतर, झोप झाली, दिवस सुरु झाला की, शरीराला उर्जेची कमतरता भासते आणि सकाळी उठल्यावर शरीराला उर्जेची नितांत आवश्यकता असते. त्यामुळे तुम्ही नाश्ता वगळला तर शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही आणि याचा परिणाम हळूहळू तुमच्या आरोग्यावर होतो.

नाश्ता न केल्यानं रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि या सवयीमुळे लठ्ठपणा वाढतो. आरोग्य संशोधनानुसार, जे लोक नाश्ता वगळतात त्यांना टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका तीस टक्के जास्त असतो. रक्तातील साखरेच्या असंतुलित पातळीमुळे हे परिणाम होतात.

advertisement

Kidneys : शरीरातल्या गाळण्या - मूत्रपिंडं, योग्य सवयींनी राहतील किडन्या शाबूत

नाश्ता वगळल्यानं शरीराला आवश्यक ग्लुकोज मिळत नाही. अशा परिस्थितीत, शरीराला त्याची साठवलेली ऊर्जा वापरावी लागते. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी शरीर अधिक इन्सुलिन तयार करतं, ज्यामुळे स्वादुपिंड थकतं.

नाश्ता वारंवार वगळल्यानं शरीर इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देऊ शकत नाही, ही स्थिती इन्सुलिन प्रतिरोधकता म्हणून ओळखली जाते, ज्यामुळे मधुमेह होऊ शकतो. नाश्ता न केल्यानं कॅलरीज कमी होतील आणि वजन कमी होईल असं वाटत असलं तरी ते योग्य नाही.

advertisement

Bloating : पोटाच्या तक्रारींवर रामबाण उपाय, या बदलांनी सांभाळा पोटाचं आरोग्य

सकाळी काहीही न खाल्ल्यानं दिवसभर वारंवार भूक लागू शकते आणि दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात जास्त खाण्याची शक्यता असते.

भूक लगेच भागवण्यासाठी लोक फास्ट फूड, स्नॅक्स किंवा मिठाई जास्त खातात. जास्त खाल्ल्यानं शरीरात जास्त चरबी साठते. याच कारणांमुळे हळूहळू वजन वाढत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अमरावतीतील प्रसिद्ध भजी पोहे, 30 रुपयांत भरेल पोट, अशी चव कुठंच नाही Video
सर्व पहा

याव्यतिरिक्त, नाश्ता न करण्याचा चयापचयावर परिणाम होतो. चयापचय प्रक्रियेद्वारे शरीर अन्न पचवतं आणि ऊर्जा निर्माण करतं. पण नाश्ता केला नाही तर चयापचय वेग मंदावतो, परिणामी कमी कॅलरीज बर्न होतात, थकवा येतो आणि उर्जेची पातळी कमी होते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Breakfast : न्याहारीचा आणि वजन वाढण्याचा काही संबंध असतो का ? जाणून घ्या आहारतज्ज्ञांचं मत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल