शिळं अन्न खाऊ नये, असं अनेक जण आपल्याला सांगतात. शिळं अन्न खाण्याचा शरीराला काही फायदा आहे का? त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे. ठाण्याच्या एका डॉक्टरने याबाबत व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. डॉ. मानसी मेहंदळे धामणकर असं या डॉक्टरचं नाव आहे. त्या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
advertisement
Alcohol : दररोज दारू किती प्यायची? वैजापूरच्या डॉक्टरांनीच सांगितली लिमिट
डॉ. मानसी म्हणाल्या की, बऱ्याच जणांना 24 तासांनंतर शिळं अन्नपदार्थ खायची सवय असते. या पदार्थांची त्यांना चव लागलेली असते. आयुर्वेद याला पर्युषित अन्न म्हणतं. उन्हाळ्यात दही जरी तुम्ही दिवसभर बाहेर ठेवलं तरी ते आंबलेलं असतं. त्याला तार आलेली असते. त्यामुळे जे पाणीयुक्त पदार्थ आहेत ते शिळे अजिबात खाऊ नका.
शिळं अन्न खाल्ल्याने आपल्या शरीरात घातक स्राव निर्माण होत असतात. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणं. सतत तोंड येणं, केस गळणं, केस पांढरे होणं, त्वचा विकार इत्यादी त्रास होऊ शकतात. जे पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीराला त्रास होतो असेल, अशी सवय असेल तर ती कधीही सोडणं चांगलं, असं त्या म्हणाल्या.
अन्न टाकायचं नाही ही आपली भारतीय परंपरा आहे. त्यामुळे शिळं अन्न कधीतरी खा पण बनवतानाच ते प्रमाणात बनवा, म्हणजे तुम्हाला शिळं अन्न खायलाच लागणार नाही, असा सल्ला डॉ. मानसी यांनी दिला आहे.
शिळं अन्न खाण्याचे तोटे
विषबाधा : शिळं अन्न खाल्ल्याने माणसाला विषबाधा होण्याचा सर्वाधिक धोका असतो. अन्न शिजवल्यानंतर दोन तासांच्या आत फ्रीजमध्ये न ठेवल्यास त्यामध्ये अनेक बॅक्टेरिया आणि फंगस निर्माण होऊ लागतात. त्यामुळे शरीरात विषारी पदार्थांचं प्रमाण वाढतं. असं अन्न खाल्ल्याने विषबाधा होऊ शकते. खासकरून शिळा भात व बटाटा यातून विषबाधेचा धोका सर्वाधिक असतो.
Pregnancy : प्रेग्नंट होण्यासाठी किती वेळा शारीरिक संंबंध ठेवावे लागतात, कितीदा ट्राय करावं?
पचनाशी संबंधित समस्या : शिळ्या अन्नामध्ये असलेले बॅक्टेरिया पचनाशी संबंधित समस्या निर्माण करू शकतात. हे बॅक्टेरिया पचनसंस्थेवर परिणाम करतात आणि पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीसारख्या समस्या होतात. अशा परिस्थितीत ज्यांची पचनशक्ती आधीच कमकुवत आहे त्यांनी चुकूनही शिळं अन्न खाऊ नये. कारण यामुळे त्यांच्या पोटात इन्फेक्शन होऊ शकतं. अन्न विषबाधा खूप जास्त वाढल्यास उलट्यांसोबत पोटात खूप दुखू लागतं, त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं व डायरियाची समस्या होते.
पोषकतत्त्वांची कमतरता : अन्न वारंवार गरम केल्याने त्यातील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांसारखे पोषक घटक नष्ट होतात. असं अन्न खाल्ल्याने शरीराला पुरेसं पोषण मिळत नाही. या अन्नामध्ये असलेल्या बॅक्टेरियामुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात.
