यासाठी योग्य पद्धत अवलंबून विचारांवर नियंत्रण ठेवणं आणि मानसिक आरोग्य सुधारणं शक्य आहे. यासाठी काही टिप्स तुम्हाला उपयोगी येतील.
आवडतं काम करा.
अतिविचार आणि मनातला गोंधळ कमी करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे आवडणाऱ्या गोष्टी करणं. संगीत ऐकणं, चित्रकला, बागकाम किंवा स्वयंपाक असे अनेक पर्याय आहेत. आवडीचं काम केल्यानं मन शांत होतं आणि सकारात्मक वाटतं.
advertisement
व्यायामाची सवय लावा.
मनात सतत विचार येत असतील तर व्यायाम हा त्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे. व्यायाम केल्यानं शरीर सक्रिय राहतंच, शिवाय मनही ताजंतवानं होतं आणि शांत वाटतं. दररोज केवळ वीस-तीस मिनिटं व्यायाम केल्यानं अतिविचार करण्याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतं.
विचार लिहून ठेवा.
अनेकदा मनात खूप विचार येतात, त्यावर नियंत्रण कसं करायचं कळत नाही. यासाठी, विचार कागदावर लिहायला सुरुवात करा. डायरी लिहिल्यानं मन हलकं होतं आणि यामुळे लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.
Glass Skin : सणासुदीच्या दिवसात दिसा स्पेशल, ग्लास स्किनसाठी वापरा या खास टिप्स
प्रवास करा.
जास्त विचार करण्यानं किंवा काहीही न करण्यानं मन अधिक भरटकत राहतं. यासाठी बाहेर पडा, कारण अशावेळी निसर्गाशी जोडलं जाणं अत्यंत फायदेशीर आहे. दररोज थोडा वेळ फिरायला जाणं, उद्यानात वेळ घालवणं किंवा मित्रांसोबत बाहेर जाणे यामुळे मनाला आराम मिळतो आणि अतिविचार कमी होतो.
हे उपाय केल्यानंतरही अतिविचाराची सवय जात नसेल त्याचा मानसिक त्रास होत असेल तर मनोवैज्ञानिकांचा सल्ला घ्या.