TRENDING:

Diabetes : तिशीच्या टप्प्यावर व्हा अलर्ट, मीठ आणि साखरेवर करा कंट्रोल, या डाएट टिप्स नक्की वाचा

Last Updated:

गोड खाणं आणि मीठाचं प्रमाण कमी करणं प्रत्येकाला जमेलच असं नाही, पण यासाठी घरातले इतर पदार्थ  मदत करतात. भविष्यात मधुमेह रोखण्यासाठी किंवा मधुमेह नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहारात असतात.आयुर्वेद आहाराला औषध मानतो. संतुलित आहार म्हणजे संतुलित जीवन. पाहूयात आयुर्वेदात यासाठी सुचवलेले पदार्थ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वयाच्या तिशीपासून तब्येतीबद्दल अलर्ट होणं गरजेचं आहे. डॉक्टरांच्या मते, चांगल्या आरोग्यासाठी, तिशीनंतर, आहारात गोड आणि मीठाचं प्रमाण निम्म्यानं कमी केलं पाहिजे.
News18
News18
advertisement

गोड खाणं आणि मीठाचं प्रमाण कमी करणं प्रत्येकाला जमेलच असं नाही, पण यासाठी घरातले इतर पदार्थ  मदत करतात. भविष्यात मधुमेह रोखण्यासाठी किंवा मधुमेह नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहारात असतात.आयुर्वेद आहाराला औषध मानतो. संतुलित आहार म्हणजे संतुलित जीवन. पाहूयात आयुर्वेदात यासाठी सुचवलेले पदार्थ.

मेथीचे दाणे आणि ओट्स - मेथीचे दाणे आणि ओट्स दोन्ही मधुमेह नियंत्रित करण्यासाठी आणि इन्सुलिन रेझिस्टन्स संतुलित करण्यास मदत करतात. दोन्हीमधे ग्लुकोमनन आणि बीटा-ग्लुकन असतात, जे विरघळणारे तंतू आहेत. यामुळे रक्तातील साखरेच्या वाढीला प्रतिबंध होतो.

advertisement

Brain Power : चांगल्या स्मरणशक्तीसाठी महत्त्वाची माहिती, वापरा ब्रेन पॉवर टिप्स

दालचिनी आणि कारली - दालचिनी आणि कारली हे दोन्ही भारतीय स्वयंपाकघरातले वापरातले पदार्थ. मधुमेह टाळण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा कारली खा. जेवणात दालचिनी वापरू शकता आणि सकाळी रिकाम्या पोटी दालचिनीचं पाणी पिऊ शकता. कारलं आणि दालचिनीमुळे पेशी सक्रिय राहतात, ज्यामुळे त्यांना ग्लुकोजचा अधिक प्रभावीपणे वापर करता येतो.

advertisement

हे सर्व घटक सहज उपलब्ध असतात, त्यामुळे याचा आहारात समावेश करा. यात मॅग्नेशियम, ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि फायबर असतं आणि यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता वाढत.

Kamal Mudra : शरीर, मनाच्या थकव्यावर प्रभावी उपाय, कमळ मुद्रा साधेल संतुलन

दिवसातून किमान एक फळ खाल्ल्यानं आहार पूर्ण होतो. मधुमेहींनी पेरू, सफरचंद आणि नाशपाती खावं, या फळांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि त्यामुळे साखरेचं प्रमाण जलद वाढण्यास प्रतिबंध होतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळीचे दर घसरले, आल्याचे भाव तेजीत, डाळींबाची काय स्थिती?
सर्व पहा

तसंच, निरोगी दैनंदिन दिनचर्या देखील आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, दिनचर्येत अनेक बदल आवश्यक आहेत. दररोज तीस मिनिटं चालणं, हलका व्यायाम करणं, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरेची पेयं टाळणं आणि शेवटी, पुरेशी झोप घेणं या गोष्टी नियमित केल्यानं प्रकृती चांगली राहिल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diabetes : तिशीच्या टप्प्यावर व्हा अलर्ट, मीठ आणि साखरेवर करा कंट्रोल, या डाएट टिप्स नक्की वाचा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल