जाणून घेऊयात यकृताच्या आरोग्सासाठी कोणते पदार्थ हे धोकादायक ठरू शकतात.
advertisement
फळांचा ज्यूस: अनेक जण म्हणतात की, निरोगी राहण्यासाठी फळं खाणं हे फायद्याचं मानलं जातं.मग फळांचा ज्यूस कसा धोकादायक ठरू शकतो. याचं साधं सोपं कारण आहे की फळांमध्ये जरी विविध पोषकतत्त्वं असली तरीही फळांच्या ज्यूसमध्ये फक्त साखर असते. त्यातच ज्यूसचा आंबटपणा घालवण्यासाठी ज्यूस विक्रेता त्यात आणखी साखर टाकतो. त्यामुळे फळांचा ज्यूस हा ज्यूस न राहता ते साखर पाणी होतं. त्यामुळे फळांचा ज्यूस प्यायल्याने रक्तातली साखर वाढून यकृतावर ताण येऊ शकतो. त्यामुळे यकृताच्या आरोग्यासाठी फळांच्या रसा पिण्याऐवजी फळं खा. ज्याचा फायदा तुम्हाला होईल.
तेल: तुमचे यकृत निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या जेवणात तेलाचा वापर खूप कमी करा. बियांपासून काढलेल्या तेलामध्ये ओमेगा -6 फॅटी ॲसिड असतात. यामुळे शरीराची दाहकता वाढते. ज्यामुळे तुमच्या यकृताला सुस्थितीत काम करणं कठीण होतं. त्यामुळे बियांच्या तेलाऐवजी ऑलिव्ह ऑइल वापरलं तर तुम्हाला नक्की फायदा होईल.
कृत्रिम रंगांसह, प्रक्रिया केलेलं अन्न: यकृताच्या आरोयासाठी प्रक्रिया केलेल्या अन्नाचा वापर कमी करा. जर प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमध्ये कृत्रिम रंग वापरलेले असतील तर असं अन्न खाणं तुमच्या यकृताच्या आरोग्यासाठी दुहेरी धोक्याचं ठरू शकतं. त्यामुळे कृत्रिम, रासायनिक रंग आणि प्रक्रिया केलेलं अन्न खाणं टाळा.
लाल मांस: लाल मांस आणि प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये संतृप्त चरबीचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे असे अन्नपदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने हृदयविकार आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. यामुळे कर्करोगाचा धोकाही वाढतो.
आपल्या शरीरासाठी यकृत का महत्त्वाचं ?
यकृत हे आपल्या शरीरातलं सुपर कंम्प्युटर आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी यकृत 500 पेक्षा जास्त काम करतं आणि ते सतत करत राहतं. शरीर निरोगी ठेवण्यासाठी अशुद्ध रक्त शुद्ध करणं, शरीरातून विषारी पदार्थ मुत्राद्वारे काढून टाकणं, अन्न पचवण्यासाठी शरीरात आवश्यक ती पाचक एंजाइम तयार करणं, प्रथिने आणि हार्मोन्ससारख्या इतर महत्त्वाच्या गोष्टी शरीरारत सोडणं ही यकृताची काही प्रमुख कामं. याशिवाय यकृताचं आणखी एक महत्त्वाचं कार्य म्हणजे पित्त तयार करणं. याच पित्तामुळे विविध जे आपल्या शरीराला आपल्या पोटातून वाईट गोष्टी बाहेर काढण्यास मदत करते. यामुळे यकृत निरोगी राहणं हे महत्त्वाचं ठरतं.
