नेमकं कारण काय?
खोबरेल तेल आळून बसण्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यातील फॅटचा प्रकार. खोबरेल तेलात सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअसच्या खाली गेलं की हे तेल घट्ट होतं आणि आळून बसतं. याउलट शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन आणि बदाम तेलामध्ये अनसॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात असते. या प्रकारच्या फॅटमुळे थंडीतही ही तेलं द्रवरूपातच राहतात आणि त्यांचं स्वरूप बदलत नाही.
advertisement
बाप्पाच्या दर्शनानं नववर्षाची सुरुवात! दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची अलोट गर्दी, Video
म्हणूनच थंडीच्या दिवसांत खोबरेल तेल आळलेलं दिसतं, तर शेंगदाणा, सूर्यफूल, सोयाबीन आणि बदाम तेल द्रवरूपातच राहतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे तेलातील फॅटचा प्रकार. खोबरेल तेलात सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असल्यामुळे थंडी वाढली की ते घट्ट होतं. मात्र इतर तेलांमध्ये अनसॅच्युरेटेड फॅट जास्त असल्याने थंडीतही त्यांच्या स्वरूपात फारसा बदल होत नाही.





