या कारखान्यात तयार होणाऱ्या बनावट खतासाठी लागणारा कच्चा माल गुजरातमधील भावनगर येथून आणला जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करत निकृष्ट दर्जाची खते बाजारात विकली जात होती, आणि त्यामागे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचे संकेत मिळत आहेत.
या रॅकेटचे जाळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांपर्यंत पसरले असल्याचा संशय असून, तपास यंत्रणांनी चौकशीचा फास आवळला आहे. कृषी विभागाने केलेल्या कारवाईत 25 लाख रुपये किमतीचे बनावट खत जप्त करण्यात आले असून कोट्यावधी रुपयांचा माल यामध्ये विक्री केला असावा असा संशय व्यक्त होत असून याचा सखोल तपास सध्या पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे
advertisement
Location :
Satara,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 7:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शेतकऱ्यांनो तुमचं खत बनावट तर नाही? साताऱ्यातील कारखान्यावर कृषी विभागाची धाड, गुजरातचा माल
