नेमकं काय म्हणाले तटकरे?
भुजबळ यांच्या बद्दलच्या चर्चा निरर्थक आहेत. भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. पक्षाच्या जडणघडणीत आणि भुमिकांमध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल आहे. या चर्चा निव्वळ अफवा असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना तटकरे म्हणाले की, नाशिक लोकसभेच्या बाबतीत त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. त्यावेळी योग्य निर्णय होऊ शकला नाही. राज्यसभेसाठी भुजबळ इच्छुक होते, मात्र पार्लमेंट्री बोर्डाच्या बैठकीत सर्वानुमते सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले. भुजबळ सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. त्यामुळे पक्षात नाराजी असण्याचं काही कारण नाही.
advertisement
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मराठा-ओबीसी आरक्षणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीच्या सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. आरक्षणासंदर्भात ज्या भावना निर्माण झाल्यात त्याचं निरसन करण्याचं काम आमचं सरकार करेल असं तटकरे यांनी म्हटलं आहे.
