देवेंद्र फडणवीस गोडबोल्या माणूस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा बदमाश आणि गोडबोल्या माणूस आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्रचे वाटोळे केले. ईडी, सीबीआय , इन्कम टॅक्स या खात्याचा वापर करुन महाराष्ट्रामधील पक्ष देवेंद्र फडणवीस यांनी फोडले. त्यामुळे भाजपात आज दिसत असलेली नेत्यांची गर्दी ही या खात्याच्या कारवाईच्या भीतीपोटीची गर्दी असल्याचे म्हणत जगताप यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
advertisement
सरकारकडून भांडणं लावण्याचे काम, आम्हीही सरकारमध्ये आहोत पण आधी शेतकरी बाकी नंतर....
जत विधानसभा मतदारसंघात बाहेरून लोक येतात, पैसे वाटतात आणि आमदार होतात. गोपीचंद पडळकर जतमध्ये महिनाभरात आला आणि आमदार झाला. जातीयवाद आणि पैशाच्या जोरावर जतमध्ये कुणी पंधरा दिवसात तर कुणी महिनाभरात येऊन आमदार होतो, असे म्हणत विलासराव जगताप यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली. तर जातीजातीत आणि धर्माधर्मात भांडणे लावण्याचे आणि नको ते विषय उकरून काढून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा उद्योग सध्या सरकार कडून सुरू आहे. आम्ही पण सध्या सरकारमध्ये आहोत पण आधी शेतकऱ्यांसोबत आहोत, असेही विलासराव जगताप म्हणालेत.