अंकुश काकडे काय म्हणाले?
अजित पवार आणि माझ्या राजकारणाची सुरुवात एकाच काळात झाली. जिल्हा बँकेचे संचालक म्हणून आम्ही कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे अजित पवार यांनी खासदार, आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री अशा विविध पदांवर काम केले. पण हे करीत असताना जनसामान्यांच्या कामासाठी ते रात्रंदिवस झटत राहिले.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरच्या काही काळाने आपण एकत्र आले पाहिजे, असे अजित पवार मला म्हणाले. तुम्ही आणि विठ्ठल शेठ मणियार यांचे पवारसाहेबांशी चांगले संबंध आहेत. तुम्ही एकत्रिकरणाचा विषय काढून बघा. त्यांचे मत जाणून घ्या, असे अजित पवार मला म्हणाले होते. त्यांच्या म्हणण्यांनुसार आम्ही शरद पवार यांच्याशीही बोललो होतो. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये तशा प्रकारच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या.
advertisement
दोन्ही पक्षांनी एकत्र आलेच पाहिजे, अशी अजित पवार यांची तीव्र इच्छा होती. महापालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही एकत्रही आलो. त्याआधी १२ डिसेंबरला दोन्ही पक्ष एकत्र आणून अजित पवार यांना पवारसाहेबांना बर्थडे गिफ्ट द्यायचे होते, परंतु काही कारणांनी ते शक्य झाले नाही. त्यांच्या हयातीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या नाहीत, ही बोच आम्हालाही लागून राहिलेली आहे, असे जड अंत:करणाने अंकुश काकडे यांनी सांगितले.
