नेमकं कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 15 ते 20 हल्लेखोरांच्या जमावाने सरपंच आणि त्यांच्या कुटुंबातील एकूण आठ जणांवर जीवघेणा हल्ला करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांत तक्रार दाखल
advertisement
या गंभीर हल्ल्याबाबत राठोड कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, पीडित कुटुंबाने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जखमींवर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, या घटनेमुळे वसंतनगर आणि परळी तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपींना अटक करावी आणि त्यांना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
