लक्ष्मण आहेर सांगतात की, टोणगाव येथे 2019 मध्ये खरबूज या फळ-पिकाच्या लागवडीला सुरुवात झाली. त्यावेळी खरबूज काढण्यासाठी आले आणि लॉकडाऊन लागले. तेव्हा एकरी 25 टन खरबूज निघत होता. नंतर ते खरबूज लॉकडाऊनमध्ये नेमकं कुठे द्यायचे हा प्रश्न पडला होता. स्थानिक व्यापारी यायचे ते एक-दोन क्विंटल खरबूज घेऊन जायचे, दोन वेळेस या व्यापाऱ्यांनी खरबूज नेले आणि दोन ते तीन तासातच ते परत खरबूज देण्यासाठी यायचे.
advertisement
कडाक्याच्या थंडीमुळे केळी बागेला फटका, असं करा संरक्षण, कृषी तज्ज्ञांचा सल्ला
त्यांना विचारले की, हे खरबूज तुम्ही कुठे विकता व्यापाऱ्यांचे उत्तर आलं आणि रस्त्यावर हे खरबूज विकतो तेव्हा डोक्यात विचार आला की, रस्त्यावर खरबूज विकू शकता, तर मी का नाही आणि त्या दिवसापासून मुकुंदवाडी, खेडेगाव, वस्ती तांडे अशा ठिकाणी खरबूज विक्री केले. त्यामुळे ठरवले या पिकाचे उत्पादन घेऊन स्वतः या फळाची विक्री करायची आणि तेव्हापासूनच खरबूज शेतीला खरी सुरुवात झाली.
तीन एकर क्षेत्रामध्ये 20 लाखांचे उत्पन्न
खरबूज शेतीमध्ये एकरी 25 टन तर एकूण तीन एकर क्षेत्रामध्ये 75 टन खरबूज उत्पादन दरवर्षी घेतले जाते. खरबुजाची लागवड पाच बाय एक वर करण्यात आली आहे, तसेच एकूण तीन एकर शेतीत 18 ते 19 हजार झाडांची लागवड केली आहे. सध्या तरी या पिकाची समाधानकारक स्थिती आहे. त्यामुळे 20 ते 22 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे देखील आहेर यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
खरबूज शेती कशी करावी?
खरबूज शेती करायची झाल्यास सुरुवातीला ज्या ठिकाणी आपल्याला ही शेती करायची आहे तेथे जमिनीची चांगली मशागत करावी लागते, पाच फुटावर बेड पाडायचे आहेत, त्यानंतर शेणखताचे मिश्रण करून टाकायचे आहे. याबरोबरच जैविक शेती करायची झाल्यास गांडूळ खत, शेणखत तसेच रासायनिक खत असा भेसळ डोस करून वापरला आहे. खरबूज शेती ही 70 ते 80 दिवसांची असल्यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील या शेतीत उतरायला हवे, त्यामुळे कमी वेळात चांगले उत्पन्न देखील मिळते.





