मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही आपल्या काका-काकीकडे राहत होती. तिच्या परिस्थितीचा फायदा घेत एकाने तिच्याशी ओळख वाढवली. तसेच ‘तुझ्यासाठी चांगला मुलगा पाहिला आहे’ असे सांगत तिचा विश्वास जिंकला. त्यानंतर 26 फेब्रुवारी 2026 रोजी दोन अनोळखी व्यक्तींच्या मदतीने तिला गाडीत बसवून ठाण्याहून बीड जिल्ह्यात नेण्यात आले.
Beed: ‘ती’ पतीसोबत झोपलेली, ‘त्यानं’ रात्री घरात घुसून उचललं, नदीवर नेलं अन्...बीड हादरलं
advertisement
बीड येथे पोहोचल्यानंतर अल्पवयीन मुलीची ओळख पाटोदा तालुक्यातील एका वयस्कर व्यक्तीशी करून देण्यात आली. संबंधित व्यक्तीचे वय अधिक असल्यामुळे मुलीने लग्नास साफ नकार दिला. मात्र, आरोपींनी दबाव आणत 27 फेब्रुवारी रोजी तिचे लग्न जबरदस्तीने लावून दिले.
लग्न झाल्यानंतर मुलीला उंबरहीर परिसरातील शेतातील एका घरात ठेवण्यात आले. ती ज्या ठिकाणी राहत होती ते ठिकाण गावापासून दूर होते. तसेच तिच्याकडे मोबाईल नसल्यामुळे तिला कोणाशीही संपर्क साधता येत नव्हता. 10 मार्च रोजी काही ओळखीचे लोक भेटायला आल्यानंतर तिने आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली.
दरम्यान, सुरुवातीला सासरच्या लोकांनी तिला बाहेर सोडण्यास नकार दिला, मात्र, काही अटींवर तिला जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर तिने आपल्या नातेवाइकांच्या मदतीने पोलिस ठाणे गाठले. या प्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा व इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
