वाल्मीक कराडला दोषमुक्त का केलं नाही?
न्यायालयाने वाल्मीक कराडला दोषमुक्त न करण्यामागे खालील प्रमुख निरीक्षणे नोंदवली आहेत. यामध्ये वाल्मिक कराड टोळीचा म्होरक्या आहे. तो घटनेचा मुख्य सूत्रधार असून संतोष देशमुख खंडणीच्या अडसर आले म्हणून अपहरण करत कट रचून हत्या केल्याचं समोर आले आहे. तसेच वाल्मीक कराडवर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून मागील 10 वर्षात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे वाल्मीक कराडला दोषमुक्त केलं जाऊ शकत नाही.
advertisement
वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या
आवादा एनर्जी प्रकल्प चालकाला धमक्या देणं. त्याचबरोबर महत्त्वाचे साक्षीदार आणि गोपनीय जबाब डिजिटल एव्हिडन्स फॉरेन्सिक पुराव्या आधारे वाल्मीक कराडला दोषमुक्त करण्यात येत नसल्याचं न्यायालयाचं म्हणणं आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेल्याचं पहायला मिळत आहे.
दरम्यान, वाल्मीक कराडच्या विरोधामध्ये सबळ पुरावे असल्यामुळे वाल्मीक कराड याचा जमीन फेटाळण्यात आल्याचेही न्यायालयाने निरीक्षणात नमूद केले आहे.