नेमके प्रकरण काय?
२६ डिसेंबर २०२५ रोजी खोपोलीत राजकीय वैमनस्यातून मंगेश काळोखे यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. काळोखे आपल्या मुलीला शाळेत सोडून परतत असताना त्यांच्यावर तलवार, कुऱ्हाड आणि कोयत्याने हल्ला करण्यात आला. त्यांच्याव तब्बल २७ वार करून त्यांचा जीव घेण्यात आला. या घटनेने संपूर्ण रायगड जिल्हा हादरून गेला होता.
advertisement
राजकीय वैमनस्यातून सुपारी देऊन हत्या
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही हत्या पूर्णपणे नियोजित होती. नगरपरिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी २० लाखांची सुपारी देऊन मंगेश काळोखे यांचा काटा काढण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत मुख्य मारेकऱ्यांसह १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
भरत भगत यांची चौकशी सुरू
या हत्याकांडाचा कट रचल्याचा संशय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांच्यावर व्यक्त केला जात होता. न्यायालयाने यापूर्वीच भरत भगत याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. जामीन फेटाळल्यानंतर भगत पोलिसांना चकवा देत होता, मात्र आता तो स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. या घटनेचा अधिक तपास खोपोलीचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.
