मागच्या बऱ्याच काळापासून अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्यात यावं, अशी मागणी होत होती. यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलनंही केली गेली. या आंदोलनांनंतर राज्य सरकारने नामांतराचं आश्वासन दिलं होतं. अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने पारित केला आणि मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे, त्यामुळे अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
advertisement
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
October 04, 2024 5:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संभाजी नगर, धाराशिवनंतर आता महाराष्ट्रातल्या या जिल्ह्याचं नामांतर, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
