TRENDING:

दादा अकाली गेले, दुःखाचा डोंगर आहे पण... शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया!

Last Updated:

Sunetra Pawar: अजितदादांचा लोकाभिमुख वारसा पुढे नेत महाराष्ट्राच्या सेवेसाठी कर्तव्य भावनेने सज्ज असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची नोंद झाली आहे. राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाने सुनेत्रा पवार यांची एकमुखाने गटनेतेपदी निवड केल्यानंतर शपथेची औपचारिकता शनिवारी सायंकाळी पाच वाजता पूर्ण झाली. राजभवनात अत्यंत साध्या पद्धतीने सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडला. या कार्यक्रमावर दु:खाचे सावट होते.
सुनेत्रा पवार
सुनेत्रा पवार
advertisement

सुनेत्रा पवार यांनी एवढ्या घाईघाईने शपथ का घेतली? राष्ट्रवादीतील सहकाऱ्यांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी एवढी घाई का केली? असे प्रश्न महाराष्ट्रात चर्चिले जात असताना या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर दिली आहे.

दादा अकाली गेले, दुःखाचा डोंगर आहे पण...

दादांच्या अकाली जाण्याने वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मात्र त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची प्रामाणिक बांधिलकी हाच माझा खरा आधार असल्याचे ते म्हणाल्या.

advertisement

सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना मन अत्यंत भावुक झाले आहे. आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारत आहे.

दादांच्या अकाली जाण्याने वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मात्र त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची प्रामाणिक बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करत राहीन, हा विश्वास मी आज या निमित्ताने देते.

advertisement

या कठीण काळात महाराष्ट्रातील जनतेने दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठिंबा हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने आणि नव्या ऊर्जेने पुढे चालत राहीन. शेतकऱ्यांच्या हितासाठी, युवकांच्या संधींसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य असेल.

advertisement

देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या 'विकसित भारत 2047' या संकल्पनेला बळ देण्यासाठी तसेच देशाचे गृह व सहकारमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य शासन सदैव तत्पर राहील. तसेच, नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही सर्वजण अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडू.

advertisement

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या साथीने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी, सामाजिक समता, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक समृद्धी साधण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. जनतेच्या अपेक्षांना न्याय देणे, शासन-प्रशासन अधिक संवेदनशील व लोकाभिमुख बनवणे आणि राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणे, हाच माझा संकल्प आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महागाईचा फटका स्वयंपाक घराला, डाळींचे भाव तब्बल ऐवढ्या रुपयांनी वाढले, कारण काय?
सर्व पहा

पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचे, सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करीन, हा शब्द देते, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दादा अकाली गेले, दुःखाचा डोंगर आहे पण... शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल