TRENDING:

Mohol News: रक्ताचं पाणी करून बाग फुलवली पण, खर्चही निघाला नाही; बागेवर नांगर फिरविण्याची शेतकऱ्यावर वेळ

Last Updated:

पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या पपईच्या बागेवर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकरी नागेश गायकवाड यांनी नांगर फिरवला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर: पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या पपईच्या बागेवर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेतकरी नागेश गायकवाड यांनी नांगर फिरवला आहे. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण पपईच्या बागेवर रोग पडल्याने बागेवर नांगर फिरवण्याची वेळ नागेश यांच्यावर आली आहे. या संदर्भात अधिक माहिती शेतकरी नागेश गायकवाड यांनी लोकल 18 बोलताना दिली.
advertisement

मोहोळ तालुक्यातील शेतकरी नागेश गायकवाड यांनी तीन एकरात पपईची लागवड केली होती. पपईच्या बागेचा एकही रुपया हातात न घेता संपूर्ण बागेवर नागेश यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगर फिरवला आहे. अतिवृष्टीमुळे पपईच्या बागेवर रोग पडल्याने अर्ध्याच्या वर पपईची झाडे जळून गेली तर काहींना फळधारणा होत नव्हती यामुळे संपूर्ण बागेवर नांगर फिरवावा लागला.

advertisement

पपईच्या बागेच्या लागवडीसाठी नागेश गायकवाड यांना दोन ते अडीच लाख रुपये पर्यंत खर्च आला होता. नागेश यांची जवळपास सहा ते सात महिन्याची ही बाग होती. पपईच्या बागेची लागवड केल्यावर त्यावर कोणताही रोग पडू नये, पपईची झाडे जळून जाऊ नये करपा रोग होऊ नये, यासाठी नागेश यांनी पोटच्या मुलाप्रमाणे ही बाग जपली होती. परंतु अतिवृष्टीमुळे संपूर्ण बाग जळून गेली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शरिरासाठी पौष्टिक, हिवाळ्यात बनवा अंबाडीच्या फुलांची चटणी, चव अतिशय टेस्टी
सर्व पहा

पपईची बाग अतिवृष्टीमुळे जळाली नसती, तर नागेश गायकवाड यांना या बागेपासून लागवडीचा खर्च वजा करून सहा ते सात लाखाचा उत्पन्न मिळणार होता. पपईच्या बागेवर पाहिलेल्या सर्व स्वप्नावर नागेशने नांगर फिरवला आहे. शासनाने बळीराजाकडे लक्ष देऊन योग्य ती मदत करावी असे आवाहन शेतकरी नागेश गायकवाड यांनी केले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mohol News: रक्ताचं पाणी करून बाग फुलवली पण, खर्चही निघाला नाही; बागेवर नांगर फिरविण्याची शेतकऱ्यावर वेळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल