लग्नाच्या चौथ्या दिवशीच बुडून नवरदेवाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गडचिरोली जिल्ह्यातील बिनागुंडा येथे घडली. नवनीत राजेंद्र धात्रक (वय 27) रा. चंद्रपूर असं नवरदेवाचं नाव आहे. यात घटनेत नवरदेवासह आणखी एका व्यक्तीचाही बुडून मृत्यू झाला. बादल श्यामराव हेमके (वय 39) रा. आरमोरी असे दुसऱ्या मृतकाचं नाव आहे.
advertisement
नवनीत हा लग्नानंतर भामरागड तालुक्यातील बिनागुंडा धबधब्यावर पत्नी आणि इतर नातेवाईकांसोबत फिरायला गेला होता. तेव्हाच तो पाण्यात बुडू लागला. तो पाण्यात बुडत असल्याचं पाहून त्याला वाचवण्यासाठी बादल हेमके धावले. यावेळी या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. बादल हे भामरागड तालुक्यातील पल्ली ग्राम पंचायतमध्ये ग्रामसेवक होते. ते भामरागड येथे राहत होते. हेमके आणि धात्रक यांचं कुटुंब बिनागुंडा येथे फिरण्यासाठी गेलं होतं. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
किरकोळ वादातून पत्नी आणि मुलीसमोर खून
छत्रपती संभाजीनगरमधील रांजणगाव शेणपुंजी येथूनही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात रात्री १० वाजेच्या सुमारास टपरी चालकाचा किरकोळ वादातून पत्नी आणि मुलीसमोरच चाकूने सपासप वार करत खून केल्याची घटना घडली. रस्त्यावरील हा प्रकार पाहून नागरिकही भयभीत झाले. या घटनेत सुनील राठोड यांचा मृत्यू झाला आहे
