TRENDING:

Ajit Pawar : महायुतीच्या पराभवाला राष्ट्रवादी कारणीभूत; 'विवेक'च्या आरोपांवर अजितदादा स्पष्टचं बोलले

Last Updated:

Ajit Pawar : संघाशी संबंधित मासिक ऑर्गनायझरपाठोपाठ आता 'विवेक' या मराठी मासिकानेही राष्ट्रवादीसोबतच्या निवडणूक युतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ajitगडचिरोली : भाजप-शिवसेनेच्या महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रवेशापासून भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप कार्यकर्त्यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. आता 'विवेक' या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित साप्ताहिक मराठी मासिकात राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील मैत्रीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. 'विवेक'मध्ये लिहिलेल्या लेखात भाजपचे कार्यकर्ते पराभवासाठी राष्ट्रवादीसोबतच्या युतीला जबाबदार धरत आहेत, याचा अर्थ त्यांना ही युती पसंत नाही, असे म्हटले आहे. शिवसेनेसोबतच्या युतीला पाठिंबा देताना हिंदुत्वावर आधारलेली युती भाजप आणि कार्यकर्त्यांसाठी सोयीची होती. मात्र, राष्ट्रवादीच्या बाबतीत तसे नाही, असे म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
News18
News18
advertisement

काय म्हणाले अजित पवार?

राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साप्ताहिक विवेक मधील लिखाणाबाबत प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, की कुणी काहीही लिहिले तरी मी त्याविषयी बोलण्यास बांधील नाही. आम्ही विकासासाठी महायुती केली आहे. असेही पवार म्हणाले.

advertisement

'ऑर्गनायझर'मधूनही झाली होती टीका

याआधी आरएसएसच्या ऑर्गनायझर नावाच्या मासिकातही राष्ट्रवादीसोबतच्या युतीवर भाष्य करण्यात आले होते. राज्यात राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा निर्णय योग्य नव्हता, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याचे रतन शारदा यांनी आपल्या लेखात म्हटले होते. यामुळे आता 'पार्टी विद डिफरन्स' राहिलेली नाही. दुसरीकडे अजित पवार यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे पक्षाचे कार्यकर्ते मतदानासाठी बाहेर पडले नाहीत आणि निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला.

advertisement

विधानसभा निवडणुकीत भाजपने युती सुरू ठेवल्यास कार्यकर्ते निष्क्रिय होतील आणि पक्षाचा पराभव होऊ शकतो. निवडणुकीनंतर भाजपच्या सदस्यांची संख्या 100 च्या खाली जाईल आणि ते सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत राहणार नाही, असे नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

वाचा - 'भिकेचे डोहाळे लागलेल्या सरकारचं डोकं..' लाडका भाऊ योजनेवरून शेतकरी नेते संतापले

advertisement

अजित पवार गटातही कुरबुरी

दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. छगन भुजबळ यांच्याशिवाय पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी अजित पवारांपासून दूर असल्याचे संकेत दिलेत. अलीकडेच छगन भुजबळ यांनी पुन्हा शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर राष्ट्रवादीच्या चार कार्यकर्त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. महायुतीमध्ये विधानसभेच्या जागावाटपाबाबतही पेच निर्माण झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 288 सदस्यीय विधानसभेत राष्ट्रवादीने 100 जागांवर दावा केला होता. मात्र, भाजप आणि शिवसेना केवळ 55 जागा देण्यास तयार आहेत. भाजपच्या या प्रस्तावावर अजित पवारही खूश नसल्याची चर्चा आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/गडचिरोली/
Ajit Pawar : महायुतीच्या पराभवाला राष्ट्रवादी कारणीभूत; 'विवेक'च्या आरोपांवर अजितदादा स्पष्टचं बोलले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल