तर मृत दोन महिला माओवाद्यांपैकी रेश्मा मडकामवर खून दरोडा चकमक असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर चार लाख रुपयांच बक्षीस ठेवण्यात आलं होतं. तर पेरमिली दलमची तिसरी सदस्य असलेल्या कमला मडावीवर देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत. तिला पकडण्यासाठी दोन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.
दरम्यान सोमवारी गडचिरोली पोलिसांनी चकमकीत ठार केलेले हे तीनही माओवादी माओवाद्यांच्या पेरमिली दलमचे सदस्य आहेत. गेली 40 वर्षे दक्षिण भागात खून दरोडे जाळपोळ पोलीस दलावर हल्ले असे गंभीर गुन्हे करून या माओवाद्यांनी पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण केलं होतं. मात्र आता या तिघांच्या मृत्यूनंतर पेरमिली दलमध्ये एकही माओवादी नसल्याने पेरमिली दलम संपुष्टात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
advertisement
1991 मध्ये या पेरमिली दलमने केलेल्या हल्ल्यात तब्बल दहा राज्य राखीव दलाच्या जवानांचा मृत्यू झाला होता. पेरमिली दलम संपुष्टात आल्याने गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या हिंसक कारवायांवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश येणार आहे, असं येथील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
