TRENDING:

गणेश नाईकांचा ठाण्यात पुन्हा 'दरबार', शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची आक्रमक रणनीती

Last Updated:

Ganesh Naik Thane Janata Darbar: विधानसभा निवडणुकीत राज्यात क्रमांक एकचा पक्ष असलेल्या भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आक्रमक डावपेच आखणे सुरुच ठेवले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : ठाणे जिल्ह्यातून एकमेव आमदार गणेश नाईक यांनाच भाजपने मंत्रिपदावर संधी दिल्यानंतर आता त्यांच्यावर एकनाथ शिंदे यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या ठाण्यात भाजपचा गड अधिक बळकट करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात पक्षाच्या वाढीसाठी सातत्याने जनता दरबार घ्यावेत, अशा सूचना गणेश नाईक यांना भाजप नेतृत्वाकडून मिळाल्याचे सांगण्यात येते. गणेश नाईक यांचे ठाण्यातील जनता दरबार हे एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्यासाठीच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
एकनाथ शिंदे-गणेश नाईक
एकनाथ शिंदे-गणेश नाईक
advertisement

महायुती सरकार सत्तेत येऊन जवळपास चार महिने उलटून गेले आहेत. भाजपच्या १३२ जागा निवडून आल्या असल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आक्रमक डावपेच आखणे सुरुच ठेवले आहे. मित्रपक्षांचा प्रभाव असला तरीही तेथे आपल्या पक्षाची ताकद असलीच पाहिजे, असा भाजपचा होरा आहे.

गणेश नाईक हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आहेत. ठाणे जिल्ह्यात काम करण्याचा त्यांना गेली ३० ते ३५ वर्षांचा अनुभव आहे. याच अनुभवाच्या जोरावर ठाणे जिल्ह्यातील पक्षसंघटना वाढीची जबाबदारी भाजपने गणेश नाईक यांच्या खांद्यावर दिली आहे.

advertisement

येत्या ११ एप्रिल रोजी गणेश नाईक यांचा जनता दरबार ठाणे शहरात होणार आहे. तसे बॅनर देखील ठाणे जिल्ह्याभर लावण्यात आले आहेत. मंत्री गणेश नाईक यांना भारतीय जनता पक्षाचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख बवण्यात आले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा छुपा संघर्ष पहायला मिळतोय.

advertisement

फेब्रुवारी महिन्यात गणेश नाईक यांनी पहिला जनता दरबार दोन दशकानंतर ठाण्यात घेतला होता. या जनता दरबाराला लोकांची प्रचंड उपस्थिती होती. त्यावेळी सरकारमधले फक्त अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे हे उपस्थित होते परंतु शिंदे गटाचा एकही पदाधिकारी गणेश नाईकांच्या जनता दरबारला उपस्थित राहिला नव्हता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

यानंतर आता पुन्हा एकदा ११ एप्रिल २०२५ या दिवशी मंत्री गणेश नाईक हे ठाण्यात जनता दरबार घेणार आहेत. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कोणी हजेरी लावतायेत की पुन्हा गणेश नाईकांच्या जनता दरबाराकडे पाठ फिरवतात, यावरुन शिंदे विरुद्ध नाईक लढाई कितपत खोलवर गेलीये हे स्पष्ट होईल.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गणेश नाईकांचा ठाण्यात पुन्हा 'दरबार', शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची आक्रमक रणनीती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल