तीन महिन्यांच्या आत वाहतूक चालान भरणे बंधनकारक आहे. 90 दिवसांच्या कालावधीमध्ये एखाद्या वाहनाची पाच चालान न भरल्यास वाहतूक विभाग संबंधित वाहनाला ब्लॅक लिस्ट करते. केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मध्ये ई-चलानची तरतूद आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहतूक पोलीस चलानातील दंड वसूल करू शकतात. वाहनाच्या मालकाने किंवा ज्याच्या नावाने चालान जारी केले आहे.
advertisement
Success Story : नोकरी सोडली, उच्चशिक्षित बहिणींनी सुरू केला व्यवसाय, महिन्याला लाखांची कमाई
गाडी ब्लॅक लिस्ट झाल्याचे परिणाम?
तुमची गाडी ब्लॅक लिस्ट असेल तर तुम्हाला तिची विक्री करता येणार नाही. परिणामी गाडीच्या नवीन मालकाचे नाव वाहनाच्या रेकॉर्डमध्ये दिसत नाही. जर तुमच्या गाडीचा इन्शुरन्स संपला असेल किंवा संपणार असेल तर तो रिन्यू करता येणार नाही. ब्लॅक लिस्टेड गाडीसाठी नवीन इन्शुरन्स कव्हर खरेदी करता येत नाही. वाहन चालविण्यासाठी प्रदूषण नियंत्रण (पीयूसी) सर्टिफिकेट गरजेचं आहे. पीयूसी सर्टिफिकेट नसल्यास वाहतूक पोलीस दंड वसूल करू शकतात. गाडी ब्लॅकलिस्ट असल्यास पीयूसी सर्टिफिकेट काढता येत नाही.
जर एखाद्या वाहनासाठी पाच चलनं जारी केली गेली आहेत आणि 90 दिवसांच्या आत तो दंड जमा केला नसेल तर ते वाहन ब्लॅक लिस्ट होऊ शकते. तुम्ही वाहन पोर्टलला भेट देऊन तुमच्या वाहनाचा तपशील तपासू शकता. येथून तुम्हाला पेंडिंग चालानाची माहिती मिळेल. याशिवाय तुमची गाडी ब्लॅक लिस्ट असेल तर तेही समजेल.
वाहन ब्लॅकलिस्टमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे नियमभंग झाल्यास जारी होणारे ई-चलान नियमितपणे तपासणे आणि वेळेवर दंड भरणे. सर्वप्रथम वाहनधारकांनी वाहन पोर्टल (vahan.parivahan.gov.in) किंवा ई-चलान पोर्टल (echallan.parivahan.gov.in) वर जाऊन आपल्या वाहनाचा नंबर टाकून प्रलंबित चालान आहेत का ते तपासावे. मोबाईलवर येणारे एसएमएस लक्षपूर्वक वाचावेत आणि मेसेज न आल्यासही दर महिन्याला एकदा पोर्टल तपासणे आवश्यक आहे.
नियमभंग टाळण्यासाठी हेल्मेट, सीटबेल्ट, गतीमर्यादा, सिग्नल पाळणे, योग्य पार्किंग अशा नियमांचे काटेकोर पालन करावे, कारण प्रत्येक उल्लंघन लगेच सीसीटीव्हीत कॅप्चर होते. 90 दिवसांच्या आत दंड भरणे बंधनकारक असल्यामुळे एकही चालान प्रलंबित राहू देऊ नये. जर वारंवार चालान होत असतील तर आपल्या वाहनावर फास्टॅग, नंबर प्लेट, पीयूसी किंवा वाहन कागदपत्रांमध्ये काही समस्या आहेत का, हेही तपासून घेणे गरजेचे आहे. सर्व कागदपत्रे—आरसी, इन्शुरन्स, पीयूसी—नेहमी अद्ययावत ठेवा. अशा प्रकारे नियमित तपासणी, नियमांचे पालन आणि वेळेवर दंड भरण्याची सवय ठेवली तर वाहन ब्लॅकलिस्ट होण्याचा धोका पूर्णपणे टाळता येतो.





