व्यापाऱ्यांच्या बैठकीत निर्णय
उत्सवाच्या काळात येणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी अंबाबाई मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी सराफ असोसिएशनच्या सभागृहात एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला महापालिका आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, अनधिकृत रिक्षा थांबे हटवले जातील, रस्त्यांवरील पॅचवर्क सुरू आहे. अंबाबाईची पालखी मिरवणूक ज्या दिवशी असेल, तो दिवस वगळून इतर सर्व दिवस महाद्वार रोड, जोतिबा रोड, राजोपाध्ये रोड, गुजरी आणि भाऊसिंगजी रोड वाहतुकीसाठी खुले असतील.
advertisement
उत्सवासाठी विशेष नियोजन
या काळात भाविकांच्या सोयीसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पागा बिल्डिंग, मेन राजाराम आणि कपिलतीर्थ मार्केट येथे स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे. महिलांसाठी गांधी मैदान, बिंदू चौक, निर्माण चौक आणि भवानी मंडप येथे विशेष स्वच्छतागृहे असतील.
स्वच्छतेसाठी मुकादम आणि कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. उत्सवकाळात दिवसातून तीन वेळा कचरा उचलला जाईल. पावसाळा संपताच रस्त्यांवर थर्मल पट्टे मारले जातील. तसेच, अनधिकृत रिक्षा थांब्यावर आणि पट्ट्याबाहेर उभ्या राहणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केली जाईल.
याशिवाय, अल्लादियां खां पुतळा ते मिरजकर तिकटी परिसरात बॅरिकेड्स लावले जातील, जिथे वैद्यकीय व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांच्या वाहनांसाठी वेळेनुसार नियोजन केले जाईल. या काळात 24 तास पोलीस गस्त घालणार असून, अत्यावश्यक सेवांच्या गाड्यांना कोणताही अडथळा येणार नाही.
हे ही वाचा : सोनं सव्वा लाख तर चांदी जाणार दीड लाखांपर्यंत, गोल्डमॅन सॅक संस्थेच्या अंदाजावर सराफा व्यापाऱ्यांचीही मोहोर
हे ही वाचा : पुणेकरांसाठी खुशखबर! पुणे- जळगाव- भुसावळ दरम्यान तीन नवीन विशेष रेल्वे धावणार