भाजपचा शिवसेनेविरुद्ध मोर्चा
हिंगोलीत या आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे सोमवारी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण व त्यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. जिल्हा परिषद आवारात भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार झाला होता. या प्रकरणी पाच आरोपी विरुद्ध गुन्हा देखील दाखल झाला आहे. परंतु माझ्यावर झालेला हल्ला हा आमदार संतोष बांगर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सांगण्यावरून झाला, असा आरोप पप्पू चव्हाण यांनी केला होता.
advertisement
Jalgao : एकाच आठवड्यात सात अल्पवयीन मुलींवर अत्याचार, जळगाव हादरलं
या गोळीबार प्रकरणाच्या निषेधार्थ आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात पप्पू चव्हाण समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये पोलीस प्रशासन आणि आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चानंतर मोर्चात सहभागी काही जणाविरुद्ध पोलिसांप्रती अपप्रितीची भावना प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला.
दोन आरोपी ताब्यात
भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर पिस्तुलाच्या साह्याने गोळीबार झाला होता. या गुन्ह्यातील दोन मुख्य आरोपी अक्षय इंदूरिया आणि ओम पवार हे फरार झाले होते. या फरार आरोपींचा शोध पोलीस घेत होते. त्यांची माहिती देणाऱ्यांना पोलीस विभागाने 25,000 रुपयांचं बक्षीस देखील ठेवलं होतं. अखेर सोमवारी 7 ऑगस्टच्या रात्री पोलिसांच्या विशेष पथकाने पुणे जिल्ह्यातून या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं.
छ. संभाजीनगरमध्ये 7 दिवसात दोनदा गोळीबार, बापाकडून मुलीवर अत्याचाराचीही घटना
आरोपीला भूल देऊन जखमी केलं, डॉक्टरवर गुन्हा
हिंगोलीतील एका डॉक्टरने परस्परविरोधी गुन्ह्यासाठी जखमी दाखवण्याकरता एका तरूणाला भूल देऊन जखम करून खोटा पुरावा तयार केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासादरम्यान उघड झाला आहे. हिंगोलीतील पप्पू चव्हाण गोळीबार प्रकरणातील आरोपी सत्यम देशमुखच्या फिर्यादीवरून डॉ. श्रीनिवास कंदी व त्यांच्या सहकाऱ्याविरूद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
युरिया-बियाणांची चढ्या दराने विक्री, दोघांचे परवाने रद्द
हिंगोली जिल्ह्यात मागील आठवड्यात युरिया खतांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील हाताळा येथील कृषी केंद्र चालक युरिया खताची साठवणूक करून चढ्या दराने विक्री करत असल्याचे समोर आले होते. या कृषी केंद्र चालकाचा खत विक्रीचा परवाना कृषी विभागाने कायमस्वरूपी रद्द केला. त्याचबरोबर कपाशीचे बियाणे चढ्या दराने विक्री केल्याप्रकरणी वसमत येथील कृषी केंद्र चालकाचा बियाणे विक्रीचा परवाना एका वर्षा साठी रद्द केला आहे. मात्र यानंतरही युरिया खत अनेक ठिकाणी चढ्या दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत.