TRENDING:

राज-उद्धव एकत्र, इम्तियाज जलील यांना अत्यानंद, म्हणाले, मी अस्सल मराठी बोलतो मला...

Last Updated:

Imtiaz Jaleel: ठाकरे बंधू एकत्र येण्याचे अनेक राजकीय नेत्यांनी स्वागत केलेले असताना एमआयएमचे नेते, माजी खासदार इम्तियाज जलील यांनाही अत्यानंद झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर: तब्बल १८ वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज मराठी भाषेच्या निमित्ताने एका मंचावर आले. तमाम मराठीजनांचे डोळे दोन भावांच्या एकत्र येण्याकडे आस लावून बसले होते. अखेर शनिवारी वरळी डोममध्ये झालेल्या मराठी जल्लोष मेळाव्यात दोन्ही भावांनी धडाकेबाज भाषणे करीत प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवली. दोन भावांच्या एकत्र येण्याचे आगामी महापालिका निवडणुकांत मोठे परिणाम झालेले दिसतील, असे राजकीय जाणकार सांगतात. ठाकरे बंधू एकत्र येण्याचे अनेक राजकीय नेत्यांनी स्वागत केलेले असताना एमआयएमचे नेते, माजी खासदार इम्तियाज जलील यांनाही अत्यानंद झाला आहे.
राज ठाकरे-उद्धव ठाकरे-इम्तियाज जलील
राज ठाकरे-उद्धव ठाकरे-इम्तियाज जलील
advertisement

इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीवरून विरोधी पक्षांनी भाजपची कोंडी केल्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या दोन शासकीय आदेशांना स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा अधिवेशनच्या पूर्वसंध्येलाच राज्य शासनाला करावी लागली. सरकारच्या माघारीवर जल्लोष करण्यासाठी ठाकरे बंधू शनिवारी एकत्र आले होते. या मेळाव्यातून माय मराठी आणि मराठी मातीचा सन्मान कायम रहावा यासाठी ठाकरे बंधूंनी मार्गदर्शन केले. तब्बल २० वर्षांनंतर संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये आले होते. ठाकरे बंधू कौटुंबिक आणि राजकीयदृष्ट्या एकत्र आल्याने इम्तियाज जलील यांनी आनंद व्यक्त केला.

advertisement

राज-उद्धव यांच्या एकत्र येण्यावर इम्तियाज जलील म्हणाले...

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आल्याने महाराष्ट्रवासियांना चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. दोन्ही भावांचे हिंदुत्वाबद्दलचे विचार बदलले आहेत. दोघे मुस्लिमांना सोबत घेऊन राजकारण करतील, अशी आशा इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली. तसेच मी स्वतः कट्टर महाराष्ट्रीय आहे. अस्सल मराठीमध्ये बोलतो आणि मी मराठी बोलतो, त्याचा मला खूप अभिमान वाटतो..असेही जलील यांनी सांगितले.

advertisement

जे बाळासाहेबांना जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले

मुंबईतील मेळाव्यातून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेवरून सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केलं. मराठी भाषेला संपवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा कसा डाव आहे, यावर त्यांनी आपली भूमिका मांडली. शिवसेनाप्रमुख, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना जे जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं, उद्धव आणि मला एकत्र आणले, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज-उद्धव एकत्र, इम्तियाज जलील यांना अत्यानंद, म्हणाले, मी अस्सल मराठी बोलतो मला...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल