TRENDING:

Bachchu Kadu : 'राज्यात निराशाजनक परिस्थिती' बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले..

Last Updated:

Bachchu Kadu : जळगाव येथे बोलताना प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जळगाव, (इम्तियाज अहमद, प्रतिनिधी) : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी यात्रा, मेळावे आणि जाहिर सभांचा धडाका लावला आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होणार असल्याची परिस्थिती आहे. अशात महायुतीमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. महायुतीतील मित्रपक्ष असलेले प्रहार संघटनेचे प्रमुख तथा आमदार बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्यात निराशाजनक परिस्थिती असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली आहे.
News18
News18
advertisement

काय म्हणाले बच्चू कडू?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला. राज्यात निराशाजनक परिस्थिती आहे. कष्टकऱ्यांसाठी कुठल्याही योजना आखल्या जात नाहीत. मतासाठी चुकीच्या घोषणा केल्या जात आहेत, असं म्हणत राज्य आणि केंद्र सरकारवर बच्चू कडू यांनी घणाघाती टीका केली. साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. लखपती दीदी ह्या तुम्ही घोषणा करताय तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. लखपती दीदीचं गाजर तुम्ही देऊ नका. लुटता किती हे आधी पाहा, असंही बच्चू कडू म्हणाले. तर येत्या विधानसभेत महायुतीला पाठिंबा द्यायचा की? महाविकास आघाडीला? हे एक सप्टेंबर रोजी प्रहार ठरवणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात प्रहार विधानसभेची जाग लढवणार असल्याचेही बच्चू कडू म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Bachchu Kadu : 'राज्यात निराशाजनक परिस्थिती' बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल