जळगावच्या शिरसोली रोडवरील रामदेव वाडी येथे 17 दिवसांपूर्वी एक भीषण अपघात झाला होता. एक महिला आपली दोन मुलं आणि भाच्याला घेऊन दुचाकीवरून जात असताना एका सुसाट कारने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी रामदेव वाडी गावातील जमावाने अपघातग्रस्त कारमधील दोघांना बाहेर काढले. कारमधील या दोघांनीही नशा केल्याचं दिसून आलं. तर त्यांच्या गाडीत गांजाच्या पुड्या असल्याचेही पोलीस तपासात समोर आले. मात्र 17 दिवस उलटले तरी देखील अद्यापही संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली नाहीये. यामुळे आता ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत.
advertisement
आशा स्वयंसेविका राणी चव्हाण या त्यांच्या दोन मुलं आणि एक भाच्याला घेऊन घराकडे परतत असताना 7 मे रोजी भरधाव कारणे त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्या इलेक्शन ड्युटी संपवून घरी परतत असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये राणी चव्हाण यांच्यासह त्यांच्या दुचाकीवर असलेल्या तीनही मुलांचा मृत्यू झाला. समोर आलेल्या माहितीनुसार ज्या कारने धडक दिली त्या कारमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याचा मुलगा होता, तर दुसरा अभिषेक कौल नावाच्या बिल्डरचा मुलगा आहे. अपघातानंतर आरोपी ही जखमी झाले, त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान आरोपींना जेव्हा रुग्णालयात भरती केलं तेव्हा मिळालेल्या माहितीनुसार ते दोघेही दारूच्या नशेत होते. ज्या कारणे धडक दिली त्या गाडीमध्ये गांजा ही सापडलेला आहे. मात्र 17 दिवस उलटून गेले तरीही आरोपीचे अद्याप ब्लड रिपोर्ट आलेला नाहीये. आरोपी गेल्या 17 दिवसापासून मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे ते जसे बरे झाले तसं त्यांना लगेच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. मात्र या प्रकरमात महिलेचे कुटुंब आणि ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांची आंदोलनाचा इशारा दिला आहे.
