दरम्यान शनिवारी मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आठ वर्षांत विरोधकांची काही बोब पडली नाही, इतकी वर्ष बैठक का घेतली नाही असा सवाल त्यांनी उपस्थि केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, काही नसलं की विरोध करायचा एवढा एकमेव उपक्रम विरोधकांकडून सुरू आहे. मात्र आम्ही त्यांना कामातून उत्तर देतो असं पाटील यांनी यावेळी म्हटलं.
advertisement
त्यांनी यावेळी बोलतान शासन दिव्यांगांसाठी राबवत असलेल्या उपक्रमाचं देखील कौतुक केलं आहे. दिव्यांगांना सर्व सुख सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यातल्या शासनाचा जो उपक्रम आहे हा खूप चांगला उपक्रम आहे. आगामी काळात दिव्यांगांना 500 सायकलींचे वाटप केले जाणार आहे, त्या माध्यमातून त्यांनी केवळ गावात न फिरता त्या सायकलवरून त्यांना काही व्यवसाय देखील सुरू करता येईल, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
