घटनेबाबत अधिक माहिती अशी की, उन्हाळ्यामुळे भुसावळला पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लकीबानगरातील एका घरमालकाने रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथील काही मजूर विहिरीच्या कामासाठी बोलावले होते. विहिरीतील कचरा काढण्यात आला. यानंतर विहिरीच्या निम्म्या भागावर सिमेंटचा थर लावण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान ही घटना घडली आहे.
काम सुरू असताना मातीचा काही भाग कोसळला. त्यासोबत तायडे हेही खाली कोसळले आणि ते ढिगाऱ्याखाली अडकले. ही घटना त्वरित नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आली. अग्निशमन विभागाचे कर्मचारी पवन भंगाळे, दिनेश पुरोहित, गजानन जावळे हे काही वेळातच घटनास्थळी पोहचले. त्यांनी ३० ते ४० फूट खोल ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तायडे यांना तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर सुखरूप बाहेर काढले. यात तायडे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
