नेमकं काय म्हणाले अनिल पाटील
विधानसभेच्या 80 जागा लढविण्यासाठी इच्छुक आहोत. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चार जागांचा समावेश आहे. महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून यावर कमी-अधिक काय असेल तो निर्णय होईल, असं पाटील यांनी म्हटलं आहे. लोकसभेनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांत काय भूमिका राहील? या प्रश्नावर बोलताना अनिल पाटील म्हणाले, की महायुतीमध्ये असताना किंवा नसताना हा विचार करण्याची आवश्यकता नाही. जे निकष ठरले आहेत. त्यानुसार छगन भुजबळांनी 90 जागांची मागणी मागच्या मेळाव्यात केली असली, तरी किमान 80 जागा राष्ट्रवादीने लढविल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे.
advertisement
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, शक्य त्या ठिकाणी सर्वेक्षण, निवडून येण्याची क्षमता तपासून उमेदवारी किंवा जागेची घोषणा केली पाहिजे, आणि त्यासाठी आतापासूनच कामाला लागलं पाहिजे. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता महायुती उमेदवाराच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तालुकाध्यक्ष व सहकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केलं म्हणून उत्तर महाराष्ट्रात आठपैकी दोन जागा महायुतीच्या निवडून आल्या आहेत. या विजयात भाजप, शिवसेना यांच्या बरोबरीने राष्ट्रवादी अजित पवार गटाचाही सिंहाचा वाटा आहे. असं पाटील यांनी म्हटलं आहे.
