TRENDING:

दिवाळीत गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वे प्रवाशांना बसणार मोठा फटका

Last Updated:

दिवाळीनिमित्त मुंबई, पुणे या सारख्या मोठ्या शहरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्याप्रमाणात असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भुसावळ, इम्तिआज अहमद, प्रतिनिधी :  दिवाळीनिमित्त मुंबई, पुणे या सारख्या मोठ्या शहरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्याप्रमाणात असते. मिळेल त्या वाहनाने गावी जाण्याचा प्रवाशांचा प्रयत्न असतो. अनेक जण रेल्वेचं आधीच बुकिंग करून ठेवतात. मात्र जे ऐनवेळी दिवाळीसाठी गावी जाण्याचं नियोजन करत आहेत, त्यांच्यासाठी मोठी बातमी आहे. ती म्हणजे दिवाळीला एक महिला बाकी असताना आताच रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा यादी 100 पार पोहोचली आहे. मुंबई, पुणे आणि सुरतकडून येणाऱ्या गाड्या फुल्ल झाल्या आहेत.
News18
News18
advertisement

दिवाळी, छटपूजेनिमित्त रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी राहणार आहे. प्रवाशांनी पूर्वीच तिकीट काढून ठेवली आहेत. मात्र, आता वेळेवर तिकीट काढणाऱ्यांची प्रतीक्षा यादी ही १०० पेक्षा जास्त दिसत आहे. यामुळे वेळेवर प्रवासाचे तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना आता तात्काळ तिकिटाशिवाय पर्याय नाही.

पुणे, मुंबई व सूरतकडून भुसावळकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या या २६ ते ३१ ऑक्टोबर या काळात फुल्ल असून, अनेक गाड्यांना नोरूम आहे. त्यामुळे त्या गाड्यांचे तिकीट मिळणे बंद झाले आहे. दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून तिकीटे काढून ठेवली आहे.

advertisement

भाडेवाढीची भीती 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
1854 पासूनची सर्व टपाल तिकीट, छ. संभाजीनगरमध्ये भरलंय प्रदर्शन, काय आहे खास?
सर्व पहा

दिवाळीनिमित्त चाकारमाने मोठ्या संख्येनं गावी जातात असतात, रेल्वे गाड्या आधीच फूल्ल झाल्या आहेत. प्रतीक्षा यादी लागली आहे. एसटी महामंडळाच्या बस देखील मर्यादीत असल्यामुळे अनेकजण या काळात खासगी ट्रॅल्वल्सने प्रवास करतात. त्यामुळे भाडेवाढीची शक्यता आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
दिवाळीत गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वे प्रवाशांना बसणार मोठा फटका
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल