जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहुर येथे ट्रकने सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाचवी इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला असून अपघातात मुलीचे वडीलदेखील जखमी झाले आहेत. ज्ञानेश्वरी भामरे असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थीनीचे नाव असून आपण स्वतः लिहिलेल्या कविता कवी संमेलनात सादर करण्यासाठी वडिलांच्या सायकलवर शाळेत जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर संताप झालेल्या नागरिकांनी पहूर बस स्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
advertisement
अपघातवार
जळगाव जिल्ह्यातील पाचोराहुन जळगावकडे जाणाऱ्या चालत्या बसचे मागील चाक निखळले असून ही बाब चालकाच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ गाडी थांबवून अपघात रोखला आहे. जळगाव जिल्ह्यातील शिरसोली-वावडदा रस्त्यावर हा प्रकार घडला असून प्रवाश्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. पाचोरा आगराची बस ही पाचोऱ्याकडून जळगाव कडे जात असताना तसेच जळगावात सुरू असलेल्या शिवमहापुरान कथेच्या पार्श्वभूमीवर बस मध्ये प्रचंड गर्दी होती. अचानक चालत्या बसचे मागचे चाक बाहेर आल्याचा प्रकार चालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे शेकडो प्रवाश्यांचे प्राण वाचले असून एसटी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारचा फटका प्रवाश्यांना बसला आहे.
वाचा - तळवडे MIDC मधल्या फटका कंपनीला भीषण आग, 7 जणांचा मृत्यू
कंटेनरमुळे ट्रॅफीक जाम
जळगावातील म्हसावदकडून जाणाऱ्या एका कंटेनरला वीज तारा अडथळा ठरत असल्यामुळे कंटेनर एकाच जागी थांबले. त्यामुळे या रस्त्यावरून जाणारी संपूर्ण वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांब लांब लांब लागल्याचे पाहायला मिळाले. कंटेनरमुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आधीच या रस्त्यावर पुलाचे काम सुरू आहे तर दुसरीकडे कंटेनरला वळविण्यास पुरेशी जागा नसल्याने ते रस्त्यात अडकल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. काही वेळाने नागरिकांनी मध्यस्थी केल्यानंतर तासाभराने वाहतूक सुरळीत झाली.
