पाऊस झाल्यामुळे तलावाचा पाणीसाठा वाढल्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. अग्निशामक दलाने दोन तास परिश्रम घेऊन मृतदेह बाहेर काढले आहे. दरम्यान या दोन भावांच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जालना सामान्य रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहेत.
advertisement
आशियातील सर्वात छोटं रेल्वे जंक्शन! शांत अन् सुंदर वातावरणातील 'हे' जंक्शन पार पाडतं मोठी जबाबदारी
जालना शहरातील मोती तलाव परिसरात शहरातील अनेक जण फिरण्यासाठी येत असतात. काही तरूण या तलावात पोहण्याचे प्रयत्न देखील करतात. जालना शहरातील जुने आणि आसिफ हे देखील दुपारी 1 वाजेच्या दरम्यान पोहण्यासाठी तलावात उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. अग्नीशामक दलाला याबाबत माहिती मिळताच त्यांनी शोधमोहिम सुरू करून अवघ्या 1 ते दीड तासांत दोन्ही मृतदेह बाहेर काढले आहेत.
दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पानपट्टे यांनी दिली आहे. दरम्यान मोती तलाव इथे पोहण्यासाठी येवू नये, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.





