दीपेश भुरेवाल आणि त्यांचे 11 सहकारी मित्र मागील तीन वर्षांपासून ही यात्रा करत आहेत. गाडीने किंवा रेल्वेने प्रवास करण्याऐवजी त्यांनी सायकल निवडली. सायकलवर प्रवास करताना जास्त आनंद मिळतो. वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देता येतात आणि पैशांची बचत होते त्याचबरोबर शरीर देखील तंदुरुस्त राहते. त्यामुळे आम्ही हा प्रवास करत असल्याचे भुरेवाल यांनी सांगितलं.
advertisement
Mumbai News : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! बेस्टनंतर मेट्रोतही मोफत प्रवासाचे संकेत; अंतिम निर्णय काय?
हे 12 तरुण दररोज 100 किमी प्रवास करणार आहेत. सुरुवातीला राजस्थानमधील बाबा खाटूशाम इथे जाणार असून त्यानंतर हे तरुण माता वैष्णोदेवीसाठी रवाना होतील. या संपूर्ण प्रवासात त्यांना सायकलसह 30 हजार रुपये खर्च येणार आहे. रात्री ते वेगवेगळ्या मंदिरात मुक्काम करतील. दररोज 500 रुपये खर्च येईल. तर सायकलचा खर्च 10 ते 12 हजार रुपये असल्याचे दिनेश भुरेवाल याने सांगितले.





