द्राक्ष बागा पाण्यात
जालना जिल्ह्यातील अंभोरेवाडी परिसरामध्ये द्राक्ष बागांना तलावाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. द्राक्ष बागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं असून यामुळे द्राक्ष बागांवर विविध रोगांच्या प्रकोपांची शक्यता आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या दुधना नदीला मे महिन्यातच पूर आला आहे. गोलापांगरी शिवारात झालेल्या मुसळधार पावसामुळे दुधना नदी तुडुंब भरून वाहत असल्याचं पाहायला मिळत आहे.
advertisement
Rain Alert: रेड, ऑरेंज अन् यलो अलर्ट काय असतो? नेमका अर्थ काय? संपूर्ण माहिती
मंदिरावर कोसळली वीज
जालना जिल्ह्यातील पानेवाडी येथील महादेवाच्या मंदिरावर वीज कोसळ्याची घटना देखील घडली आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला असून पुलावरून नागरिक धोकादायक वाहतूक करत आहेत. राजेगाव येथे नदीवरील पुलावरून पाणी वाहत असून यामुळे आसपासच्या अनेक क्षेत्रांमध्ये पाणी शिरले आहे. तर शेतजमिनीचे देखील मोठे नुकसान झालेय.
माती वाहून गेली
“रात्री झालेल्या पावसाने शेतामध्ये खूप नुकसान झाला आहे. अवकाळी पावसाने शेतामध्ये पाणी शिरले. यामुळे जमीन खरडून गेली. पाण्याच्या प्रवाहाने शेताचे वळण फुटले. शेतामध्ये खडक उघडा पडलाय. त्यामुळे शेती पिकने कठीण आहे. राजेगाव घनसावंगी रस्त्यावर पुलावरून वाहणारे पाणी शेतामध्ये शिरते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी व मोठ्या पुलाचं बांधकाम करावं,” अशी मागणी शेतकरी भरत उगले यांनी केलीये.
दरम्यान वादळी पावसाने जिल्ह्यात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या, घराच्या भिंती पडण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तर काही ठिकाणी नदीवरील जुने पूल वाहून गेल्याने देखील मोठ्या अडचणीची स्थिती निर्माण झालीये.





