जालना शहरातून अवजड वाहनांची विशेषतः रेल्वे मालवाहतूक शेडकडे जाणारी वाहनांची वर्दळ ही वाहतूक कोंडी आणि अपघाताचे प्रमुख कारण आहे. या वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याचा निर्णय स्थानिक रहिवाशी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला. जालना शहरातील सामाजिक कार्यकर्ते साईनाथ चिन्नदोरे यांनी सातत्याने जालना शहरातून होत असलेल्या अवजड वाहतच्या धोक्याविषयी जिल्हा प्रशासनाला सूचित केले होते. तसेच शहरातून मालवाहतूक करणारी अवजड वाहने अपघातांचे प्रमुख कारण ठरत असल्याने ती बंद करण्याची मागणी केली होती.
advertisement
मराठवाड्यात ठेवीदारांना 350 कोटींचा चुना, चंदुलाल पोलिसांच्या ताब्यात, पुढे काय?
असा असेल पर्यायी मार्ग
अतिरिक्त जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये असा निर्णय करण्यात आला की रेल्वे विभाग रेल्वेच्या जमिनीवर मालवाहतूक शेड पासून अंतर्गत रस्ते बांधेल. तर जालना महानगरपालिका उर्वरित रस्त्यांचे नेटवर्क विकसित करेल. त्यामुळे मालवाहतूक ट्रकना शहरातून न जाता अंबड उड्डाणपूलापर्यंत पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होईल.
लवकरच बांधणार पर्यायी मार्ग
रेल्वे आणि जालना महानगरपालिका लवकरच रस्ते बांधणी पूर्ण करण्यासाठी सहकार्य करतील या उपायोजनांमुळे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी आणि अपघात लक्षणेरीत्या कमी होऊन वाहनांची वाहतूक सुगम होईल आणि रहिवाशांसाठी सुधारित सुरक्षा निश्चित होईल परंतु या प्रस्तावाला अंमलबजावणी पूर्वी वरिष्ठ अधिकारी यांची मंजुरी आवश्यक असेल, असं महानगरपालिकेचे प्रशासक दीपक इंगोले यांनी सांगितलं.






