जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. वादळी वाऱ्यासह होत असलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान देखील होत आहे. नंदापूर येथील उबाळे यांची दहा वर्षांची लिंबोणीची एक एकर बाग आहे. वादळी पावसात या बागेचे नुकसान झाले असून झाडे उखडून पडली आहेत. त्यामुळे उबाळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
advertisement
मराठवाड्यात शिरलं मान्सूनचं वारं, सोसाट्याचा वारा अन् दाणादाण 7 जिल्ह्यांसाठी अलर्ट
पाण्याची कमतरता असतानाही उबाळे यांनी मोठ्या प्रयत्नांनी लिंबोणी जपली होती. बागेसाठी मोठा खर्च केला होता. तसेच 4 बोअरवेल घेतल्या होत्या. तरीही पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने पाणी विकत घेऊन बाग जगवली होती. मुला मुलींचे शिक्षण आणि मुलींची लग्नं आणि घर खर्च अशा सगळ्या अवलंबून होतं. परंतु उदरनिर्वाहाचे साधन असलेली बागच भुईसपाट झाल्याने त्यांच्यावर दुःखाचाडोंगर कोसळला आहे.
नेकम घडलं काय?
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसात लिंबोणी बागेतील काही झाडांचे नुकसान झाले. तर काही झाडे पूर्णपणे उन्मळून पडली. तलाठ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे. सरकारने या अस्मानी संकटाची दखल घेऊन तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केलीये.