TRENDING:

Ind vs Pak: महाराष्ट्रातलं असं हे 'सैनिकांचं गाव', जिथे प्रत्येक घरात तयार झाला जवान, न चुकता पाहा VIDEO

Last Updated:

सैनिकांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गावातील जवळपास प्रत्येक घरातून एक किंवा अधिक व्यक्ती भारतीय सैन्यदलात सेवा देतात. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या या सैनिकांच्या धैर्याच्या आणि समर्पणाच्या कहाण्या या गावात प्रत्येक पावलावर ऐकायला मिळतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोल्हापूर : भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी तळांवर नुकत्याच केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे भारत-पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढला आहे. येणाऱ्या काळात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर, लोकल 18 च्या प्रतिनिधीने कोल्हापूर जिल्ह्यातील गिरगाव या छोट्याशा गावातील माजी सैनिकांशी संवाद सांधला. सैनिकांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गावातील जवळपास प्रत्येक घरातून एक किंवा अधिक व्यक्ती भारतीय सैन्यदलात सेवा देतात. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या या सैनिकांच्या धैर्याच्या आणि समर्पणाच्या कहाण्या या गावात प्रत्येक पावलावर ऐकायला मिळतात.
advertisement

गिरगाव हे कोल्हापूरपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेलं एक छोटंसं गाव. येथील 500 हून अधिक कुटुंबांपैकी 300 हून अधिक कुटुंबांनी आपले सुपुत्र सैन्यदलात पाठवले आहेत. गावात प्रवेश करताच जय हिंद आणि भारत माता की जयच्या घोषणा लावलेल्या फलकांचं स्वागत होतं. गावातील सैनिकांनी कारगिल युद्ध, 1971 चं युद्ध आणि इतर अनेक लहान-मोठ्या चकमकींमध्ये आपलं शौर्य दाखवलं आहे.

advertisement

India Vs Pakistan: युद्धबंदीचं काय झालं? ओमर अब्दुलांनी पाकड्यांचे पुरावेच दिले, LIVE VIDEO

गावातील माजी सैनिक आणि कारगिल युद्धातील वीर, कॅप्टन (निवृत्त) संभाजी पाटील यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. आम्ही सैनिक आहोत, देशासाठी लढणं हा आमचा धर्म आहे. पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घातलं, तर भारत शांत राहणार नाही. आमच्या सैन्याची ताकद आणि तयारी अशी आहे की, कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. त्यांच्या शब्दांतून देशभक्तीचा जोश आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता.

advertisement

गावातील तरुण सैनिक विशाल जाधव यांनीही आपले विचार मांडले. आम्ही सीमेवर लढण्यासाठी नेहमी तयार असतो. गावातून मिळालेल्या संस्कारांमुळे आमच्यात देशाप्रती निष्ठा आहे. जर युद्ध झालं, तर आम्ही शत्रूला धडा शिकवूअसं विशालने सांगितलं. विशालच्या कुटुंबात त्यांचे वडील आणि मोठा भाऊही सैन्यात आहेत. त्यांच्या घरी देशभक्ती हा वारसा आहे.

advertisement

गावातील महिलाही मागे नाहीत. सैनिकांच्या पत्नी आणि माता यांनीही या परिस्थितीत आपली भूमिका मांडली. विशालची आई, सुमन जाधव म्हणाल्या, आमच्या मुलांना सैन्यात पाठवताना भीती वाटते, पण देशापुढे काहीही नाही. आम्ही त्यांना अभिमानाने निरोप देतो. गावातील महिलांनी सैनिकांसाठी प्रार्थना आणि हवनाचं आयोजनही केलं आहे.

advertisement

गिरगावच्या सरपंच, अनुराधा कदम यांनी गावातील एकजुटीचं दर्शन घडवलं. आमचं गाव सैनिकांचं आहे. युद्धजन्य परिस्थिती असो वा शांतता, आम्ही नेहमी देशाच्या पाठीशी आहोत. गावातून सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही रक्तदान शिबिरं आणि आर्थिक मदत संकलनाचं आयोजन करत आहोतअसं त्या म्हणाल्या.

सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीत गिरगावच्या सैनिकांचं धैर्य आणि त्यांच्या कुटुंबीयांचा पाठिंबा देशासाठी प्रेरणादायी आहे. या गावाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, देशभक्ती ही रक्तात भिनलेली आहे. भारत-पाक संबंधांचा पुढील टप्पा काय असेल, हे येणारा काळच ठरवेल, पण गिरगावचे सैनिक आणि त्यांचं गाव देशाच्या रक्षणासाठी नेहमीच अग्रभागी असेल.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Ind vs Pak: महाराष्ट्रातलं असं हे 'सैनिकांचं गाव', जिथे प्रत्येक घरात तयार झाला जवान, न चुकता पाहा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल