इंडिया आघाडीचा महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यावर फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. तर आठ दिवसांत फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होईल असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.
'प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राचे नाही तर देशाचे नेते आहेत, सामाजिक क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे. आम्हाला विश्वास आहे इंडिया आघाडीत येण्याचा विचार नक्की करतील,' अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
advertisement
सोम्या-गोम्या वरून जुंपली, अजितदादांच्या टीकेवर संजय राऊतांचा पलटवार
प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरू
दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं आहे. 'प्रकाश आंबेडकर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगला समन्वय आहे, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचा संवाद आहे, आंबेडकर आणि शरद पवार यांचाही संवाद आहे, महाविकासआघाडीमध्ये त्यांना स्थान राहावं यासाठी आमच्या चर्चा सुरू आहेत. इंडिया आघाडी हा पुढचा विषय आहे', असं संजय राऊत म्हणाले.
'महाराष्ट्रामध्ये 48 पैकी किमान 40 जागा आम्ही जिंकाव्यात ही प्रकाश आंबेडकरांची, शरद पवारांची उद्धव ठाकरे यांची, राहुल गांधी यांची भूमिका आहे, त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये उत्तम समन्वय आहे आणि उत्तम चर्चा सुरू आहे', असं संजय राऊत यांनी सांगितलं.