TRENDING:

Maharashtra Dry Day: तळीरामांनो लक्ष द्या! 29 महानगरपालिका क्षेत्रात पुढचे 4 दिवस दारूचे दुकान बंद राहणार; नेमकं कारण काय?

Last Updated:

निवडणूक असणार्‍या 29 महानगर पालिकांच्या क्षेत्रात दारूची दुकाने व सार्वजनिक मद्यपान पूर्णपणे बंद असणार आहेत. नियम तोडणाऱ्यांवर सरकारकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
तब्बल 29 महानगर पालिकांच्या निवडणुका महाराष्ट्रात पार पडणार आहे. निवडणुकींसाठी प्रत्येक राजकीय पक्ष कंबर कसून तयारी करताना दिसत आहे. राज्यातल्या राजकीय पक्षांचा प्रचार आता सध्या शेवटच्या टप्प्यात आला आहे. उद्या अर्थात 13 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता सर्व प्रचारांच्या तोफा थंडावणार आहेत. 15 जानेवारीला मतदान असून 16 जानेवारीला मतमोजणी आहे. 29 महानगर पालिकांच्या मतदानाच्या काळात ड्राय डे असणार आहे. 13 जानेवारी ते 16 जानेवारीपर्यंत ड्राय डे असणार आहे. या काळामध्ये, निवडणूक असणार्‍या 29 महानगर पालिकांच्या क्षेत्रात दारूची दुकाने व सार्वजनिक मद्यपान पूर्णपणे बंद असणार आहेत. नियम तोडणाऱ्यांवर सरकारकडून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
Maharashtra Dry Day: तळीरामांनो लक्ष द्या! 29 महानगरपालिका क्षेत्रात पुढचे 4 दिवस दारूचे दुकान बंद राहणार; नेमकं कारण काय?
Maharashtra Dry Day: तळीरामांनो लक्ष द्या! 29 महानगरपालिका क्षेत्रात पुढचे 4 दिवस दारूचे दुकान बंद राहणार; नेमकं कारण काय?
advertisement

राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते सोशल मीडिया, रोड शो आणि सभा यांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व राजकीय पक्षांच्या आगामी महानगरपालिका निवडणुकींसाठी सुरू असलेला प्रचार 13 जानेवारीला सायंकाळपासून बंद होणार आहेत. त्याचवेळीपासून ड्राय डे सुद्धा लागू होणार आहे. या काळात राज्य शासनाने नागरिकांसाठी विशेष नियम जाहीर केले आहेत. ज्या महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे तेथील दारूची सर्व दुकानं बंद राहतील. या नियमाचा प्रभाव महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका क्षेत्रात राहील, ज्यात मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण- डोंबिवली, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यांसह प्रमुख महानगरपालिका समाविष्ट आहेत. याकाळात नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
संक्रांतीची खरेदी बाकीये? खरेदी करा वस्तू, पुण्यात इथं भरलंय प्रदर्शन, Video
सर्व पहा

ड्राय डे ठेवण्यामागे शासनाचे असे उद्दिष्ट आहे की, निवडणूकीच्या काळात शांतता, सुरक्षितता आणि अनुशासन राखणे आवश्यक आहे. मद्यपानावरील बंदीमुळे मतदारांना सुरक्षित मतदानाचे वातावरण मिळेल, तसेच निवडणुकीसंबंधी गैरप्रकार आणि दंगली टाळता येतील. दुकानदारांना ही माहिती आधीच देण्यात आली आहे. शिवाय, सार्वजनिक जागांवर पोलीस आणि प्रशासनाचे नियंत्रण वाढवले जाणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाईल. अशा प्रकारे 13 जानेवारीपासून 16 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमध्ये चार दिवसांचा ड्राय डे लागू असेल, ज्यामुळे मतदानाची प्रक्रिया सुरक्षित, शांत आणि पारदर्शक होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Dry Day: तळीरामांनो लक्ष द्या! 29 महानगरपालिका क्षेत्रात पुढचे 4 दिवस दारूचे दुकान बंद राहणार; नेमकं कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल